शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये होणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी काही दिवसांत जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर करू, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला ...

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी काही दिवसांत जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर करू, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला त्यात विशेष प्राधान्य असेल, अशी ग्वाही जिल्हाभरातील ग्रामपंचायत सरपंचांनी दिली. जिल्हास्तरीय स्वच्छता संवाद उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात स्वच्छताविषयक कामांचा ऊहापोह झाला. त्यात सरपंचांनी हा निर्धार बोलून दाखविला.

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम म्हणाले की, जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे ‘स्थायित्व व सुजलाम् अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे होण्याकरिता सांडपाणी व्यवस्थापन आणि शोषखड्ड्यांची निर्मिती केली जाणार आहेत. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संवाद उपक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनीही संवाद साधला. ते म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी व प्रत्येक घरी नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक कामे सरपंचांच्या सहभाग व सहकार्याशिवाय शक्य नाहीत, असे ते म्हणाले. सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिटकरी, पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह इतर सरपंचांनी चर्चेत सहभाग घेऊन जिल्हाभरात स्वच्छताविषयक कामांचा जागर करण्याचा निर्धार बोलून दाखविला. यावेळी माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, आदींनी मार्गदर्शन केले.