शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये होणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी काही दिवसांत जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर करू, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला ...

वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी काही दिवसांत जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर करू, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला त्यात विशेष प्राधान्य असेल, अशी ग्वाही जिल्हाभरातील ग्रामपंचायत सरपंचांनी दिली. जिल्हास्तरीय स्वच्छता संवाद उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात स्वच्छताविषयक कामांचा ऊहापोह झाला. त्यात सरपंचांनी हा निर्धार बोलून दाखविला.

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम म्हणाले की, जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे ‘स्थायित्व व सुजलाम् अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे होण्याकरिता सांडपाणी व्यवस्थापन आणि शोषखड्ड्यांची निर्मिती केली जाणार आहेत. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संवाद उपक्रमात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनीही संवाद साधला. ते म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी व प्रत्येक घरी नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक कामे सरपंचांच्या सहभाग व सहकार्याशिवाय शक्य नाहीत, असे ते म्हणाले. सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिटकरी, पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह इतर सरपंचांनी चर्चेत सहभाग घेऊन जिल्हाभरात स्वच्छताविषयक कामांचा जागर करण्याचा निर्धार बोलून दाखविला. यावेळी माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार विजय नागे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, आदींनी मार्गदर्शन केले.