शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

१२३ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:58 IST

वाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.

ठळक मुद्देगतवर्षी होते ५७ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ तब्बल ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठामध्यम प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.वाशिम जिल्ह्यात एकूण १२६ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२३ लघु प्रकल्प आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात सातत्य नाही तसेच प्रकल्प परिसरात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, प्रकल्पांतील जलसाठय़ात अपेक्षित वाढ नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत एकबुर्जी प्रकल्पाने १00 टक्क्याचा आकडा गाठून सांडव्यावरून पाणी वाहत होते. मध्यम प्रकल्प असलेल्या सोनलमध्ये आज रोजी केवळ एक टक्के जलसाठा आहे. गतवर्षी सोनल प्रकल्पात ८0 टक्के जलसाठा होता. मध्यम प्रकल्प असलेल्या अडाण प्रकल्पात आज रोजी २९ टक्के जलसाठा असून, गतवर्षी याच कालावधीत ६२.३६ टक्के जलसाठा होता.वाशिम तालुक्यातील ३२ लघु प्रकल्पात सरासरी केवळ चार टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ४८.३४ टक्के जलसाठा होता. मालेगाव तालुक्यातील २२ प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ५४.८७ टक्के जलसाठा होता. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांत सरासरी १६ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत १८ टक्के जलसाठा होता. मंगरुळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी नऊ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७३.0७ टक्के जलसाठा होता. मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पात सरासरी २0 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७९.५३ टक्के जलसाठा होता. कारंजा तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी २२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत  ५५.0६ टक्के जलसाठा होता.जिल्ह्यात एकूण ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची संख्या सर्वाधिक आहे. वाशिम तालुक्यातील २६, मालेगाव तालुक्यातील नऊ, रिसोड तालुक्यात १२, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी सहा आणि कारंजा तालुक्यातील एक अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

वाशिम तालुक्यातील प्रकल्पांतील जलसाठय़ाची स्थिती भयावहयावर्षी वाशिम तालुक्यात अल्प पाऊस झाल्याने प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा असल्याचे दिसून येते. वाशिम तालुक्यात १0 बॅरेजेसची कामे झाली आहेत; मात्र दमदार पाऊस नसल्याने पैनगंगा नदीला पूर गेला नाही. परिणामी, सर्वच बॅरेजमध्ये उपलब्ध उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. दमदार पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामात सिंचन कसे करावे? या चिंतेने बॅरेज परिसरातील शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.

जलपातळीतही घट !पावसाने दडी मारल्याने जलपातळीत घट येत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना बसत आहे. पावसात सातत्य नसल्याने विहिरींत पुरेशा प्रमाणात जलसाठा आला नाही. त्यामुळे काही गावांत पाणीपुरवठा आठ दिवसांवर गेला आहे.