शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

१२३ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:58 IST

वाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.

ठळक मुद्देगतवर्षी होते ५७ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ तब्बल ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठामध्यम प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.वाशिम जिल्ह्यात एकूण १२६ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२३ लघु प्रकल्प आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात सातत्य नाही तसेच प्रकल्प परिसरात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, प्रकल्पांतील जलसाठय़ात अपेक्षित वाढ नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत एकबुर्जी प्रकल्पाने १00 टक्क्याचा आकडा गाठून सांडव्यावरून पाणी वाहत होते. मध्यम प्रकल्प असलेल्या सोनलमध्ये आज रोजी केवळ एक टक्के जलसाठा आहे. गतवर्षी सोनल प्रकल्पात ८0 टक्के जलसाठा होता. मध्यम प्रकल्प असलेल्या अडाण प्रकल्पात आज रोजी २९ टक्के जलसाठा असून, गतवर्षी याच कालावधीत ६२.३६ टक्के जलसाठा होता.वाशिम तालुक्यातील ३२ लघु प्रकल्पात सरासरी केवळ चार टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ४८.३४ टक्के जलसाठा होता. मालेगाव तालुक्यातील २२ प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ५४.८७ टक्के जलसाठा होता. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांत सरासरी १६ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत १८ टक्के जलसाठा होता. मंगरुळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी नऊ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७३.0७ टक्के जलसाठा होता. मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पात सरासरी २0 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७९.५३ टक्के जलसाठा होता. कारंजा तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी २२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत  ५५.0६ टक्के जलसाठा होता.जिल्ह्यात एकूण ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची संख्या सर्वाधिक आहे. वाशिम तालुक्यातील २६, मालेगाव तालुक्यातील नऊ, रिसोड तालुक्यात १२, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी सहा आणि कारंजा तालुक्यातील एक अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

वाशिम तालुक्यातील प्रकल्पांतील जलसाठय़ाची स्थिती भयावहयावर्षी वाशिम तालुक्यात अल्प पाऊस झाल्याने प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा असल्याचे दिसून येते. वाशिम तालुक्यात १0 बॅरेजेसची कामे झाली आहेत; मात्र दमदार पाऊस नसल्याने पैनगंगा नदीला पूर गेला नाही. परिणामी, सर्वच बॅरेजमध्ये उपलब्ध उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. दमदार पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामात सिंचन कसे करावे? या चिंतेने बॅरेज परिसरातील शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.

जलपातळीतही घट !पावसाने दडी मारल्याने जलपातळीत घट येत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना बसत आहे. पावसात सातत्य नसल्याने विहिरींत पुरेशा प्रमाणात जलसाठा आला नाही. त्यामुळे काही गावांत पाणीपुरवठा आठ दिवसांवर गेला आहे.