शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाच्या निवडणूक तारखेकडे लक्ष

By admin | Updated: June 17, 2016 02:30 IST

वाशिम जिल्हा परिषदेचा ३0 जूनला अडीच वर्षांंचा कार्यकाळ संपणार; मोर्चेबांधणीला आला वेग.

वाशिम: जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीची तारीख कधी घोषित होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ३0 जून रोजी संपणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने युती केली तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अपवाद वगळता अन्य पक्षांना दोन अंकी आकडाही गाठला आला नाही. १७ जागा घेऊन काँग्रेस हा पक्ष जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. ऐन निवडणुकीच्या काळातच गटबाजी उफाळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षांंचा कार्यकाळ येत्या ३0 जून रोजी संपत असल्याने आता निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तारीख काय? याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे. दरम्यान, २0१४ मधील विधानसभा निवडणुकीने जिल्हा परिषद सदस्य संख्येतही उलथापालथ केली. जि.प. सदस्य विश्‍वनाथ सानप दाम्पत्य मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेचे संख्याबळ १0 झाले तर मालेगाव जिल्हा परिषद गट बाद झाल्याने मनसेचे संख्याबळ एक वर आले. २0१३ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव होते. अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या सोनाली जोगदंड तर उपाध्यक्ष म्हणून राकाँचे चंद्रकांत ठाकरे हे कामकाज पाहत आले आहेत. आता सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत निघाल्याने चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसकडे स्वत:चे १७ आणि दोन अपक्ष असे १९ संख्याबळ आहे तर मित्र पक्ष असलेल्या राकाँकडे आठ सदस्य असल्याने काँग्रेस-राकाँ-अपक्ष ही आघाडी पुन्हा विराजमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेत सत्तापालट करण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणीला वेग दिल्याने आणि सोबतीला एका पक्षाच्या ह्यबह्ण गटाशी बोलणी सुरूच ठेवल्याने ऐनवेळी धक्कादायक निकाल येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.