शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

घरचेच बियाणे पेरण्यावर भर देण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST

यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्यांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून ...

यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्यांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून उगवणशक्ती तपासून घ्यावी. प्रती १०० दाण्यांपैकी ७० दाणे चांगल्यापैकी उगवल्यास उगवणशक्ती ७० टक्के असल्याचे गृहीत धरून एकरी ३० किलो बियाणे पेरणीकरिता वापरावे. तसेच ६५ टक्के उगवणक्षमता असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरण्याची गरज आहे. बियाणे उगवणशक्ती तपासण्यासंबंधी कृषी सहायक, कृषिमित्र व प्रगतिशील शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्याचा इतर शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. याबाबत कुठलीही अडचण असल्यास गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधून चर्चा करावी, असे आवाहन घोलप यांनी केले.

.................

बाॅक्स :

बियाणे, खत घरपोच मिळण्याची सुविधा

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे व खत घरपोच उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याकरिता कार्यान्वित करण्यात आलेल्या लिंकवर मागणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर बियाणे व खते रास्त दरात तथा पसंतीच्या कृषी सेवा केंद्रांमार्फत घरपोच आणून दिली जातील. मागणी करण्यासंबंधी कृषी सहायक, कृषिमित्रांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांनी केले आहे.