शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधितांवर याेग्य उपचार होत नसल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST

कोरोना संसर्गाने फेब्रुवारी महिन्यापासून आपले हातपाय पुन्हा फैलवण्यास सुरूवात केली असून, कारंजा तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. ...

कोरोना संसर्गाने फेब्रुवारी महिन्यापासून आपले हातपाय पुन्हा फैलवण्यास सुरूवात केली असून, कारंजा तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. कारंजा तालुक्यात मागील पंधरा दिवसा ३१० जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून त्यातील ७८ जणांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात, तर ९६ जणांवर गृह विलगीकरणा उपचार केले जात आहेत. उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप बाधित रूग्णांनी केला असून दरदिवशी केवळ दोन गोळ्या दिल्या जातात. शिवाय रूग्णांची कोणत्याही प्रकारची तपासणी केल्या जात नाही. शिवाय गृहविलगीकरणात उपचार घेण्यासाठी एका तपासणीच्या नावाखाली तालुक्यातील धनज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ हजार रूपये , तर कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दीड हजार रूपये घेतल्या जात असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. उपचारासाठी प्रशासनाने जबरदस्तीने दाखल केलेल्या रूग्णात काही शेतकरी तर काही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असून त्यांना अकरा दिवस सुट्टी होत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडल्याची, तर विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत नसल्याने अडचण होत असल्याची ओरड सुध्दा उपचार घेणाऱ्या बाधित रूग्णांकडून केल्या जात आहे. या संदर्भात उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाॅ. नथ्थुराम साळुंखे

यांच्याशी संपर्क साधला असता लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या रूग्णांना एक ट्रिटमेंट केल्या जात असून त्यांना ॲजीथ्रोमायसीन, पॅरासिटॅमॉल, मल्टीव्हिटॅमीन व झींक हे घटक असणाऱ्या गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तहसीलदारांनी व जिल्हा प्रशासनाने सदर प्रकाराची चैाकशी करण्याची गरज आहे.