शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सुख के सब साथी दु:ख मे न कोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार नवनविन निर्देशसुद्धा जारी करण्यात येत ...

वाशिम : कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार नवनविन निर्देशसुद्धा जारी करण्यात येत आहेत. १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार लग्नात ५० तर अंत्यविधीस २० लोकांना मुभा देण्यात आली आहे. यावरून सुखात सर्वच सोबत असतात दु:खात मात्र कोणीच नसते, अशी ‘काल्पनिक’ विचारसरणी यावरून अधोरेखीत होताना दिसत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या अनुषंगाने जिल्हा प्रशासन दर आठवड्याला नवीन निर्देश जारी करताना दिसून येत आहे. मार्च महिन्यापासून लग्नाचा धुमधडाका सगळीकडेच सुरू होत असतो. अलिकडच्या काळात लग्न म्हटलं की किमान एक हजार पाहुणे मंडळी तरी एकत्र येतातच. तर दुसरीकडे कुणाचा अंत्यविधी असला तर त्या अंत्यविधीलाही किमान पाचशे- सहाशे आप्तस्वकीय एकत्र येत असल्याचे चित्र जवळपास सगळीकडे सारखेच आहे.

सुख-दु:खाच्या कार्यक्रमामध्ये जास्त गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी तीव्र रूप धारण करू नये, यासाठी या संसर्गजन्य महामारीला वेळीच योग्य निर्बंध घालण्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव हा आटोक्यात आणण्यासाठी लग्न समारंभात ५० तर अंत्यविधीला २० लोकांनाच परवानगी दिली आहे. आणि ही परवानगी योग्यच आहे. असे असले तरी संचारबंदीच्या काळात एकत्र गप्पागोष्टी ज्यावेळी रंगतात त्यावेळी मात्र या निर्णयाला थेट ‘गोपी’ या हिंदी चित्रपटात मोहम्मद रफी यांनी गायलेल्या ‘सुख के सब साथी दु:ख मे न कोई’ या गिताची आठवण करून देताना बघावयास मिळत आहे.