शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

अकोट न.प.वर रणरागिणी धडकल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:11 IST

वृक्ष संरक्षणाकरिता महिला एकवटल्याची पहिलीच घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षतोड करणाऱ्या समाजकंटकावर वन कायद्यानुसार कारवाई करा, ही प्रमुख मागणी करीत घरातील कामे सोडून येथील रणरागिणी १७ जुलै रोजी स्थानिक नगर परिषद कार्यालयावर धडकल्या. वडाला धागे बांधून वटपौर्णिमेला वडाची पूजा करीत न बसता येथील महिला हिरवेगार वृक्ष वाचविण्याकरिता एकत्र आल्या. दारूबंदीच्या मागणीसाठी लढा उभारण्याकरिता महिला एकवटल्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत; परंतु वृक्ष वाचविण्याकरिता महिला एकवटल्याची ही घटना बहुधा पहिलीच असावी.अकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत एसडीओंचे निवासस्थान आहे. या परिसरातील ८ हिरव्यागार वृक्षांची अवैधपणे कटाई करण्यात आली. सार्वजनिक विभागाने तीन वाळलेल्या वृक्षांचा लिलाव केला; परंतु प्रत्यक्षात नगर परिषदेची परवानगी नसलेली मोठमोठी हिरवी झाडे कापण्यात आली आहेत; तसेच नरसिंग रोडवरील नझुलच्या जागेवरील हिरवेगार झाड तोडले असताना आम्ही पोहोचल्याने कटाई करणारा पळून गेला आहे. या अवैधपणे वृक्ष कटाई करण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर वन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी वृक्ष लागवड समितीच्या अध्यक्ष शोभा बोडखे, अर्पणा चिखले,चंचल पितांबरवाले, शोभना भांडे, रूचा ठाकूर, कविता राठोर, दीपाली केवटी, राधिका देशपांडे, मीनाक्षी आडे, मंजूषा बोडखे यांच्यासह अन्य महिलांनी केली. यावेळी मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीच्या सचिव गीता ठाकरे यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले. यावेळी महिलांनी, आम्ही झाडे लावतो, शासनसुद्धा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राबवित आहे; परंतु खुलेआम वृक्ष कटाईमुळे शासनाची बदनामी होत असून, योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ‘त्या’ दोघींनी वाचविले झाडाला!अकोट येथील एसडीओंच्या बंगल्यातील अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर समाजात वृक्ष वाचविण्याकरिता जनजागृती व धडपड सुरू झाली आहे. नरसिंग रोडवर नझुलच्या जागेतील एका हिरव्या झाडाची कटाई सुरू असल्याची माहिती वृक्ष लागवड समितीच्या सरचिटणीस चंचल पितांबरवाले व अर्पणा चिखले यांना मिळताच त्या तेथे धावून गेल्या. झाड तोडणाऱ्यास परवानगीपत्राची मागणी करताच त्याने पोबारा केला. त्यामुळे सदर झाड सध्या तरी वाचले. या दोघी जणी गेल्या नसत्या तर ते झाड कापले गेले असते. त्यांच्या पुढाकारामुळे महिलांनी झाड वाचविल्याचा प्रेरणादायी संदेश समाजात गेला; परंतु सध्या विविध कारणे देत वृक्ष तोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. संबंधित अधिकारी त्वरित कारवाई करीत नसल्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे फोटो सेशन करीत वृक्षारोपण करायचे तरी कशाकरिता, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्याच्या स्थितीत सर्व नागरिकांनी वृक्ष लागवडीप्रमाणेच वृक्ष वाचविण्याकरिता सर्वांनी एकजूट होण्याची गरज निर्माण झाली आहे.