शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कृषी केंद्रांमध्ये माहितीदर्शक फलकच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:18 IST

किमतीबाबत शेतकऱ्यांची होतेय फसगत : कृषी विभागाच्या निर्देशाला कोलदांडा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रासायनिक खते, कीटकनाशक व बियाण्यांच्या अधिकृत किमतीसंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये तसेच खत, बियाणे, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात उपलब्ध साठा व किमतीची माहिती दर्शविणारा तक्ता लावणे बंधनकारक आहे. या नियमाची वाशिम जिल्ह्यात सर्वत्रच पायमल्ली होत असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनने समोर आणली आहे.आता पेरणीचा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. तथापि, बहुतांश कृषी सेवा केंद्रांनी बियाणे, खते व कीटकनाशकांचा एकूण उपलब्ध साठा, अधिकृत किमती व अन्य माहितीदर्शक फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावले नाही, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधींना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम शहरातील काही कृषी सेवा केंद्रांना मंगळवार व बुधवारी भेट दिली असता, दर्शनी भागात कोणतेही फलक आढळून आले नाही. काही कृषी सेवा केंद्रांत माहितीदर्शक फलक असल्याचे दिसून आले; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे आढळून आले. खते व कीटकनाशकांच्या अधिकृत किमती किती आहेत, आवश्यक ते खत व कीटकनाशकाचा साठा किती आहे, याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी दर्शनी भागात दरपत्रक व माहिती फलक लावणे बंधनकारक आहे. मानोरा शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांत जाऊन पाहणी केली असता, एकाही ठिकाणी अद्ययावत माहितीदर्शक फलक आढळून आला नाही. एका ठिकाणी फलक होता; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे दिसून आले. रिसोड शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यावेळी एका कृषी सेवा केंद्रात माहितीदर्शक फलक आढळले; परंतु तेथे जुनीच माहिती होती, तर उर्वरित चार कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक आढळून आले नाही. कारंजा शहरातील सहा कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यापैकी एकाही कृषी सेवा केंद्रावर दर्शनी भागात किंवा दुकानाच्या आत माहितीदर्शक फलक आढळून आले नाही. वाशिम शहरातील चार कृषी सेवा केंद्रांना भेट दिली असता एका कृषी सेवा केंद्रात फलक आढळून आले तर तीन कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक नसल्याचे दिसून आले. कृषी सेवा केंद्रांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक व माहितीदर्शक फलक लावण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिलेल्या आहेत. तथापि, या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. दरपत्रक नसल्याने किमतीबाबत शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता बळावली आहे. खत व कीटकनाशकाच्या किमतीवर काही सूट असल्यास त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांची फसगत होते. याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. खताचा काळाबाजार, जादा दराने विक्री, लिंकिंग पद्धत आदी शेतकऱ्यांना भंडावून सोडणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. कृषी सेवा केंद्राला भेट देताना, त्या केंद्राच्या दर्शनी भागात माहितीदर्शक फलक आहे की नाही, याची पाहणी केली जाते की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. भरारी पथकाने अशी पाहणी केली तर सर्व केंद्रांमध्ये माहितीदर्शक झळकू शकेल, यात शंका नाही.कृषी सेवा केंद्रांनी दर्शनी भागात माहितीदर्शक फलक लावावे, अशा सूचना सर्वांनाच दिलेल्या आहेत. याउपरही कुणी या सूचनांची अंमलबजावणी करीत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. नियमाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.- नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.