शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

कृषी केंद्रांमध्ये माहितीदर्शक फलकच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:18 IST

किमतीबाबत शेतकऱ्यांची होतेय फसगत : कृषी विभागाच्या निर्देशाला कोलदांडा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रासायनिक खते, कीटकनाशक व बियाण्यांच्या अधिकृत किमतीसंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये तसेच खत, बियाणे, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात उपलब्ध साठा व किमतीची माहिती दर्शविणारा तक्ता लावणे बंधनकारक आहे. या नियमाची वाशिम जिल्ह्यात सर्वत्रच पायमल्ली होत असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनने समोर आणली आहे.आता पेरणीचा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. तथापि, बहुतांश कृषी सेवा केंद्रांनी बियाणे, खते व कीटकनाशकांचा एकूण उपलब्ध साठा, अधिकृत किमती व अन्य माहितीदर्शक फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावले नाही, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधींना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम शहरातील काही कृषी सेवा केंद्रांना मंगळवार व बुधवारी भेट दिली असता, दर्शनी भागात कोणतेही फलक आढळून आले नाही. काही कृषी सेवा केंद्रांत माहितीदर्शक फलक असल्याचे दिसून आले; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे आढळून आले. खते व कीटकनाशकांच्या अधिकृत किमती किती आहेत, आवश्यक ते खत व कीटकनाशकाचा साठा किती आहे, याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी दर्शनी भागात दरपत्रक व माहिती फलक लावणे बंधनकारक आहे. मानोरा शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांत जाऊन पाहणी केली असता, एकाही ठिकाणी अद्ययावत माहितीदर्शक फलक आढळून आला नाही. एका ठिकाणी फलक होता; मात्र त्यावर जुनीच माहिती असल्याचे दिसून आले. रिसोड शहरातील पाच कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यावेळी एका कृषी सेवा केंद्रात माहितीदर्शक फलक आढळले; परंतु तेथे जुनीच माहिती होती, तर उर्वरित चार कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक आढळून आले नाही. कारंजा शहरातील सहा कृषी सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. यापैकी एकाही कृषी सेवा केंद्रावर दर्शनी भागात किंवा दुकानाच्या आत माहितीदर्शक फलक आढळून आले नाही. वाशिम शहरातील चार कृषी सेवा केंद्रांना भेट दिली असता एका कृषी सेवा केंद्रात फलक आढळून आले तर तीन कृषी सेवा केंद्रात कोणतेही फलक नसल्याचे दिसून आले. कृषी सेवा केंद्रांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक व माहितीदर्शक फलक लावण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिलेल्या आहेत. तथापि, या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. दरपत्रक नसल्याने किमतीबाबत शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता बळावली आहे. खत व कीटकनाशकाच्या किमतीवर काही सूट असल्यास त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांची फसगत होते. याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. खताचा काळाबाजार, जादा दराने विक्री, लिंकिंग पद्धत आदी शेतकऱ्यांना भंडावून सोडणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. कृषी सेवा केंद्राला भेट देताना, त्या केंद्राच्या दर्शनी भागात माहितीदर्शक फलक आहे की नाही, याची पाहणी केली जाते की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. भरारी पथकाने अशी पाहणी केली तर सर्व केंद्रांमध्ये माहितीदर्शक झळकू शकेल, यात शंका नाही.कृषी सेवा केंद्रांनी दर्शनी भागात माहितीदर्शक फलक लावावे, अशा सूचना सर्वांनाच दिलेल्या आहेत. याउपरही कुणी या सूचनांची अंमलबजावणी करीत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. नियमाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.- नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.