शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी संताप मोर्चा

By admin | Updated: August 12, 2014 23:37 IST

अभुतपुर्व मोर्चात हजारो मनसे सैनिकांनी लावली हजेरी

मालेगाव : मागील वर्षी खरिप हंगाम अतवृष्टीमुळे व रब्बी हंगाम गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या हातून गेला. यावर्षी सुध्दा पावसाने पाठ फिरवली अशातच शासन सुध्दा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे १२ ऑगस्ट रोजी संताप मोर्चा काढण्यात आला. मंगळवार १२ ऑगस्ट रोजी मनसेतर्फे संताप मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी संपूर्ण तालुक्यातून हजारो मनसे सैनिकांनी हजेरी लावली होती. शेलु फाटयावर मनसे कार्यालयावर यात्रेचे स्वरुप आले होते. १५0 गाडयातून आलेले मनसे सैनिक मनसे कार्यालयातून जुने बसस्टॅन्डवर ते गांधी चौक मार्गे विर लहुजी पुतळयावरुन तहसील कार्यालयावर पोहोचले. मनसे जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे तालुकाध्यक्ष अशोकराव अंभोरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. तहसीलदार काळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचा समावेश होता. त्यामध्ये सोयाबिनच्या संपूर्ण पिकांना व लाभ धारक शेतकर्‍यांना पिक विमा देयात यावा दुबार तीबार पेरणीचे सर्व्हेक्षण करुन प्रति हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत शेतकर्‍यांना द्यावी. शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफ कररुन नविन पीक कर्ज माफ करावे. संपूर्ण मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.शेतकर्‍यांसाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो सुरु करावे. शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करुन त्यांना आवश्यकतेनूसार तातडीने वीज जोडणी द्यावी. आदी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे, तालुकाध्यक्ष अशोक अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष विश्‍वनाथ सानप, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव, सचिव रंजित पाटील, अनिल बळी, जि.प.सदस्य चंदू जाधव, तालुका सचिव गणेश कुटे, अमोल देशमाने, गण्ेोश ठाकुर, रंगराव पाटील, कैलास राऊत, कैलास चोपडे, माधव जाधव, डॉ.काठोळे, रंजित घुगे, सोनु बळी, अमोल लासकर, पारिसनाथ लांडकर, कैलास जगताप, हरिभाऊ देशमुख, वसंतराव आंधळे, अनिल कुटे, गोपाल इंगळे, पींटू इंगळे, महिला तालुका प्रमुख संगिता कुटे, डॉ.कविता गायकवाड, शिला घुगे, सिताबाई धंधरे, आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.