शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतर मिळाली तुरीची नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:26 IST

वाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.

ठळक मुद्देतीनच तालुक्यांचा समावेश हेक्टरी ४७८८ रुपये बँक खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.२0१४-१५ आणि २0१५-१६ या दोन वर्षांंत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्यामुळे तूर पिकाला जबर फटका बसला होता. त्यानुसार, नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळण्यास शेतकर्‍यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सध्या ही रक्कम शासनाकडून मंजूर होऊन संबंधित पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, भटउमरा, माळेगाव, सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, बिटोडा तेली, काजळंबा, खरोळा, जांभरूण महाली, ब्राह्मणवाडा, गोंडेगाव, आसोला जहाँगीर, साखरा, फुलसाखरा, काकडदाती, कोंडाळा झामरे, सुराळा, काटा, तोरनाळा, सोयता, भोयता, कळंबा महाली, किनखेडा, चिखली, धानोरा, सुपखेला, तांदळी शेवई, दुधखेडा, पार्डी आसरा, देगाव, ब्रह्म, कानडी, शेलगाव, बाभूळगाव, बोरी, मसला, फाळेगाव, जांभरूण जहाँगीर या गावांमधील नुकसानभरपाईस पात्र ४२00 शेतकर्‍यांना प्रती हेक्टर ४७८८ रुपये याप्रमाणे १ कोटी १६ लाख रुपये मंजूर होऊन, सदर रक्कम त्या-त्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित कारंजा, मानोरा या तालुक्यांमधीलही आठ हजारांच्या आसपास शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मंजूर होऊन सदर रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आर्थिक अडचणीतील शेतकर्‍यांना ‘आधार’!शेतमालाला अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकर्‍यांची परवड सुरू असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनपाठोपाठ तुरीच्या दरातही झालेली विक्रमी घसरण आणि चालू हंगामात पावसाअभावी संकटात सापडलेली पीक परिस्थिती. अशा बिकटप्रसंगी शासनाकडून २0१४-१५ आणि २0१५-१६ मधील तुरीची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांची सोय झाली आहे.