शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दोन वर्षांनंतर मिळाली तुरीची नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:26 IST

वाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.

ठळक मुद्देतीनच तालुक्यांचा समावेश हेक्टरी ४७८८ रुपये बँक खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.२0१४-१५ आणि २0१५-१६ या दोन वर्षांंत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्यामुळे तूर पिकाला जबर फटका बसला होता. त्यानुसार, नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळण्यास शेतकर्‍यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सध्या ही रक्कम शासनाकडून मंजूर होऊन संबंधित पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, भटउमरा, माळेगाव, सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, बिटोडा तेली, काजळंबा, खरोळा, जांभरूण महाली, ब्राह्मणवाडा, गोंडेगाव, आसोला जहाँगीर, साखरा, फुलसाखरा, काकडदाती, कोंडाळा झामरे, सुराळा, काटा, तोरनाळा, सोयता, भोयता, कळंबा महाली, किनखेडा, चिखली, धानोरा, सुपखेला, तांदळी शेवई, दुधखेडा, पार्डी आसरा, देगाव, ब्रह्म, कानडी, शेलगाव, बाभूळगाव, बोरी, मसला, फाळेगाव, जांभरूण जहाँगीर या गावांमधील नुकसानभरपाईस पात्र ४२00 शेतकर्‍यांना प्रती हेक्टर ४७८८ रुपये याप्रमाणे १ कोटी १६ लाख रुपये मंजूर होऊन, सदर रक्कम त्या-त्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित कारंजा, मानोरा या तालुक्यांमधीलही आठ हजारांच्या आसपास शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मंजूर होऊन सदर रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आर्थिक अडचणीतील शेतकर्‍यांना ‘आधार’!शेतमालाला अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकर्‍यांची परवड सुरू असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनपाठोपाठ तुरीच्या दरातही झालेली विक्रमी घसरण आणि चालू हंगामात पावसाअभावी संकटात सापडलेली पीक परिस्थिती. अशा बिकटप्रसंगी शासनाकडून २0१४-१५ आणि २0१५-१६ मधील तुरीची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांची सोय झाली आहे.