शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

दोन वर्षांनंतर मिळाली तुरीची नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:26 IST

वाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.

ठळक मुद्देतीनच तालुक्यांचा समावेश हेक्टरी ४७८८ रुपये बँक खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.२0१४-१५ आणि २0१५-१६ या दोन वर्षांंत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्यामुळे तूर पिकाला जबर फटका बसला होता. त्यानुसार, नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळण्यास शेतकर्‍यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सध्या ही रक्कम शासनाकडून मंजूर होऊन संबंधित पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, भटउमरा, माळेगाव, सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, बिटोडा तेली, काजळंबा, खरोळा, जांभरूण महाली, ब्राह्मणवाडा, गोंडेगाव, आसोला जहाँगीर, साखरा, फुलसाखरा, काकडदाती, कोंडाळा झामरे, सुराळा, काटा, तोरनाळा, सोयता, भोयता, कळंबा महाली, किनखेडा, चिखली, धानोरा, सुपखेला, तांदळी शेवई, दुधखेडा, पार्डी आसरा, देगाव, ब्रह्म, कानडी, शेलगाव, बाभूळगाव, बोरी, मसला, फाळेगाव, जांभरूण जहाँगीर या गावांमधील नुकसानभरपाईस पात्र ४२00 शेतकर्‍यांना प्रती हेक्टर ४७८८ रुपये याप्रमाणे १ कोटी १६ लाख रुपये मंजूर होऊन, सदर रक्कम त्या-त्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित कारंजा, मानोरा या तालुक्यांमधीलही आठ हजारांच्या आसपास शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मंजूर होऊन सदर रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आर्थिक अडचणीतील शेतकर्‍यांना ‘आधार’!शेतमालाला अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकर्‍यांची परवड सुरू असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनपाठोपाठ तुरीच्या दरातही झालेली विक्रमी घसरण आणि चालू हंगामात पावसाअभावी संकटात सापडलेली पीक परिस्थिती. अशा बिकटप्रसंगी शासनाकडून २0१४-१५ आणि २0१५-१६ मधील तुरीची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांची सोय झाली आहे.