संतोष वानखडे /वाशिम: ८ ते १६ एप्रिल २0१५ दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील ९४ गावातील ८६४ हेक्टरवरील पिकांवर ह्यपाणीह्ण फेरले होते. १0 महिन्यानंतर आता भरपाईची १ कोटी २२ लाख १८ हजार ३१0 रुपयांची रक्कम वाशिम जिल्ह्यात धडकली आहे. दुसरीकडे डिसेंबर २0१४ ते जानेवारी २0१५ या महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीच्या रकमेची शेतकर्यांना प्रतीक्षाच आहे. अवेळी पाऊस व गारपिटीमुळे ८ ते १६ एप्रिल २0१५ दरम्यान पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ३३ टक्क्यापेक्षा अधिक बाधित क्षेत्राला शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार आहे. कोरडवाहू शेतीस हेक्टरी ६८00 रुपये, ओलित हेक्टरी १३५00 तर बहुवार्षिक फळपिकांकरिता १८ हजार रुपये हेक्टरी मदत ह्यराज्य आपत्ती प्रतिसाद निधीह्णच्या सुधारित दरानुसार देण्यात येणार आहे. रिसोड तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्रफळ १0८.५८ हेक्टर आहे. ४२ गावातील ३७८ शेतकर्यांचे १0८.५८ हेक्टर क्षेत्रफळावरील कांदा बियाण्याचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. मंगरुळपीर तालुक्यात ३३ टक्क्यापेक्षा अधिक बाधित क्षेत्रफळ १३0.८३ हेक्टर होते. ३३ गावातील २६८ शेतकर्यांचे १३0.८३ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कांदा बियाणे ४५.६५, भाजीपाला २५.८८ व फळपिके ५९.३0 हेक्टरवरील पिकांचा समावेश होता. ५0 टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्रामध्ये वाशिम, मालेगाव, रिसोड व मंगरुळपीर तालुक्यातील पिकांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील ९८.५ हेक्टरवरील पिके बाधित असून, २५0 शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. यामध्ये मूग २४ हेक्टर, भाजीपाला ७३ हेक्टर, फळपिके १.५ हेक्टर अशी पिकांची हेक्टरनिहाय विभागणी आहे. मालेगाव तालुक्यातील २२१.४४ हेक्टरवरील पिके बाधित असून ३८६ शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. यामध्ये मूग ९५.९३ हेक्टर, भाजीपाला १३.0८ हेक्टर, फळपिके २0.२५ हेक्टर, कांदा बियाणे ७४.२६, पपई 0.२0, टरबूज ८.६२, फळपिके ३.५0 व इतर पिके ५.६0 अशी पिकांची हेक्टरनिहाय विभागणी आहे.
१0 महिन्यानंतर ‘अवकाळी’ मदत
By admin | Updated: February 16, 2016 01:33 IST