शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:38 IST

वाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देबँक खात्याची पडताळणी पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती बँकेचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संबंधित यंत्रणेला प्रशिक्षणही देण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची यादी माहिती-तंत्रज्ञान विभागाकडे देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्यानंतर राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. शासनाने दीड लाख रुपयांची र्मयादा घालून सरसकट कर्जमाफी दिली. कर्जमाफीसाठी वाशिम जिल्ह्यात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत; पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन घेण्यात आले. आता ग्राम पंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित २७३ गावांत चावडी वाचन सुरू केले जाणार आहे. तत्पूर्वी अचूक असलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी केल्यानंतर आता त्या संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, या शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वी या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. ही यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार असून, मंजुरी मिळताच या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाल्यानंतर ते नव्याने रब्बी किंवा खरीप पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक असे मिळून एकूण १ लाख ६४ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, दुसर्‍या टप्प्यात या शेतकर्‍यांची यादी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केली जाणार आहे. येथे पडताळणी केली जाणार असून, पडताळणीअंती अचूक यादी तयार होईल. साधारणत: दिवाळीनंतर दुसरा टप्पा सुरू होणार असून, अर्जात किरकोळ त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. 

कर्जमाफीसंदर्भात अचूक अर्ज असणार्‍या पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिने कामकाज सुरू आहे. पहिल्या टप्प्यात साधारणत: ५0 हजारच्या आसपास शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे.- रमेश कटके,जिल्हा उपनिबंधक, वाशिम