शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:38 IST

वाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देबँक खात्याची पडताळणी पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती बँकेचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संबंधित यंत्रणेला प्रशिक्षणही देण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची यादी माहिती-तंत्रज्ञान विभागाकडे देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्यानंतर राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. शासनाने दीड लाख रुपयांची र्मयादा घालून सरसकट कर्जमाफी दिली. कर्जमाफीसाठी वाशिम जिल्ह्यात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत; पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन घेण्यात आले. आता ग्राम पंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित २७३ गावांत चावडी वाचन सुरू केले जाणार आहे. तत्पूर्वी अचूक असलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी केल्यानंतर आता त्या संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, या शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वी या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. ही यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार असून, मंजुरी मिळताच या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाल्यानंतर ते नव्याने रब्बी किंवा खरीप पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक असे मिळून एकूण १ लाख ६४ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, दुसर्‍या टप्प्यात या शेतकर्‍यांची यादी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केली जाणार आहे. येथे पडताळणी केली जाणार असून, पडताळणीअंती अचूक यादी तयार होईल. साधारणत: दिवाळीनंतर दुसरा टप्पा सुरू होणार असून, अर्जात किरकोळ त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. 

कर्जमाफीसंदर्भात अचूक अर्ज असणार्‍या पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिने कामकाज सुरू आहे. पहिल्या टप्प्यात साधारणत: ५0 हजारच्या आसपास शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे.- रमेश कटके,जिल्हा उपनिबंधक, वाशिम