शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

नाती कुटुंब जोडा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

मंगरूळपीर : आज कुटुंबातील नात्याची वीण उसवली आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे; तसेच पर्यावरणातील झाडांचा ऱ्हास झाल्यामुळे ...

मंगरूळपीर : आज कुटुंबातील नात्याची वीण उसवली आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे; तसेच पर्यावरणातील झाडांचा ऱ्हास झाल्यामुळे सबंध जगावर तापमानवाढीचे संकट ओढवले आहे. घर, कुटुंब, पर्यावरण माणसाचे अस्तित्व जोपासतात; पण कृतघ्न माणूस हे सारे विसरत गेला आहे. या अनुषंगाने येथील पर्यावरणाच्या कृतिशील कार्यकर्त्यां व अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांनी ‘नाती, कुटुंब जोडा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळा’ असे युवा पिढीच्या सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीच्या भावनेला हात घालून कृतिप्रवण बनविणारे अभिनव अभियान ११ जुलैपासून सुरू केले.

मृण्मयी यांनी सर्वप्रथम कल्पनानगर, नामदेवनगर, सहकार वसाहत या परिसरात वृक्षसंगोपनाच्या अटीवर नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार रस्त्यावर दुतर्फा कडुनिंब, वड, जांभूळ, पिंपळ, करंजी, बेल, रिठा, बांबू, आवळा, चिंच, इ. वृक्षांचे घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रोपण करून घेतले. यात अनेक आजी-आजोबानी सहभाग घेतला होता. याशिवाय आजी-आजोबांचे नाते पर्यावरणाच्या माध्यमातून वृद्धिंगत व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आप्तेष्ट व मित्रपरिवार यांच्यापैकी २५ शेतमालकांच्या शेतावर जाऊन त्यांच्या कुटुंबातील आजी-आजोबांच्या हस्ते, मुले व नातू यांच्या उपस्थितीत प्रत्येक शेतात पाच आंब्यांच्या मातृवृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण मित्र कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांनी झुणका-भाकरीचे भोजन दिल्याने या उपक्रमाला भावस्पर्शी सोहळ्याचे स्वरूप आले. मृण्मयी हातोलकरांना या उपक्रमासाठी पर्यावरण मित्रमंडळाचे सतीश बंनोरे, शरद येवले, राजेश दबडे, संजय तेलंग, साहिल अबिल्डिंगे, अभिजित हातोलकर, सम्यक बनसोड, राजेंद्र जाधव, ईश्वर परंडे, मनीष राजूरकर, राजेंद्र धोपे, दिलीप पाटील, पानबिहाडे, आदींचे सहकार्य लाभले.