शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका बळीराजाला

By admin | Updated: April 26, 2017 01:17 IST

मंगरुळपीर- तीन वर्षांपासून दुष्कााळाचा सामना केलेला बळीराजा त्यामुळे उत्साहीत झाला असतानाच गतवर्षी १२ हजार रुपये प्रति क्विंटलचर असलेले तुरीचे भाव यंदा निम्याहून खाली आले.

नंदलाल पवार - मंगरुळपीरतुरीचे उत्पादन यंदा वाढले. त्यामुळे गत तीन वर्षांपासून दुष्कााळाचा सामना केलेला बळीराजा त्यामुळे उत्साहीत झाला असतानाच गतवर्षी १२ हजार रुपये प्रति क्विंटलचर असलेले तुरीचे भाव यंदा निम्याहून खाली आले. प्रत्यक्षात शासनानेच या शेतमालास अवघा पाच हजार ५० रुपये प्रति क्विंटलचा दर निश्चित करून शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घातला. आता हे कमी की काय म्हणून व्यापाऱ्यांनी मालाचा दर्जा निम्न असल्याचे कारण समोर करून तुरीची त्यापेक्षाही हजार रुपयांहून अधिक कमी दराने खरेदी सुरू केली. आता यामुळे शेतकऱ्यांची ओरड होऊ नये म्हणून शासनाने नाफेडचा फास टाकला. त्या ठिकाणी चाळणी करून शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाऊ लागला. त्यानंतरही बळीराजा गप्पच बसला. दरम्यान, नाफेडची खरेदी सुरू करताना शासन, प्रशासनाला राज्यातील तुरीची लागवड आणि उत्पादनाच्या सरासरीचा विचार करून नियोजन करणे गरजेचे होते. अर्थात तूर खरेदीचे प्रमाण आणि वखार महामंडळातील साठवणीची सांगड घालण्यासह, खरेदीच्या तुलनेत बारदाण्याचीही उपलब्धता करून ठेवणे आवश्यक होते; परंतु तसे मुळीच झाले नाही किंवा करण्यात आले नाही आणि त्यानंतर या दोनच कारणांमुळे वारंवार नाफेडची खरेदी बंद ठेवण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, राज्य वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील त्यांच्या गोदामांतील शिल्लक जागेचा आढावा मार्च महिन्याच्या प्रारंभीच घेतला होता. त्यावेळी साठवणुकीचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असताना त्यांच्याकडून भाड्याने गोदामे घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले नाही. त्याशिवाय व्यापाऱ्यांच्या तुलनेत नाफेडकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असताना सहापैकी पाच ठिकाणी केवळ एक मापारी आणि पाच, सहा हमाल घेऊन नाफेडच्यावतीने अतिशय संथगतीने तुरीची मोजणी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला चार ते सहा हजार क्विंटल तूर मोजून हमाल, व्यापारी, अडते आणि शेतकरीही मोकळे होत असताना. नाफेडसह रिसोड येथील शासकीय खरेदी केंद्रावर दिवसाला पाचशे क्विंटल तुरीची मोजणीही होऊ शकली नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात नाफेड खरेदी सुरू झाल्यानंतर २२ एप्रिलपर्यंतच्या तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत केवळ दोन लाख ९ हजार क्विंटल तुरीची मोजणी होऊ शकली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, अनसिंग आणि रिसोड या सहा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले, तर मानोरासह शिरपूर, शेलुबाजार या उपबाजारात वेळोवेळी मागणी करूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. या सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठा खर्च करून त्यांना नजिक असलेल्या बाजारातील नाफेड केंद्रावर तूर आणावी लागली. यासाठी शेतकऱ्यांना वाहनांचे मोठ्या प्रमाणात भाडे त्यांना भरावे लागले. महिना, महिनाभर शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात खुल्या जागेत पोत्यावर झोपून रात्ररात्र जागत बसावे लागले. नाफेड खरेदी सुरु झाल्यानंतर मंगरुळपीर येथे दोन महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक ५१ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. हे खरे असले तरी, याच ठिकाणी नाफेडकडे आलेली शेकडो शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही मोजणीअभावी पडून आहे. यातील अनेक शेतकऱ्यांनी, तर १५ दिवसांपूर्वीच या ठिकाणी ट्रॅक्टर, कटले, टाटा ४०७ अशा वाहनांत तूर विक्रीसाठी आणून ठेवली आहे. आता शासनाने खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. आता शासनाकडून या शेतकऱ्यांचा विचार होतो, की नाही ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेकडो वाहने बाजार समितीच्या परिसरात अद्यापही उभी नाफेडची खरेदी २२ एप्रिल रोजी बंद करण्यात आली. त्याची घोषणाही पूर्वी झाली होती; परंतु मोजणी वेगाने होईल आणि आपला थोडाफार तरी फायदा होईल, या आशेने शेकडो शेतकऱ्यांनी त्यापूर्वी तीन चार दिवस अगोदर मिळेल, त्या वाहनांत भरून तूर मंगरुळपीर येथील नाफेडच्या केंद्रावर खरेदीसाठी आणली. तथापि, त्यांच्या तुरीची मोजणी तर दूरच. उलट या शेतकऱ्यांच्या वाहनांना बाजार समितीच्या आवारात प्रवेशही मिळू शकला नाही. अशी शेकडो वाहने अद्यापही बाजार समितीच्या परिसरात नाफेडची खरेदी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत उभी ठे वण्यात आली आहेत.