शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

८६ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 15:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत गेल्या १५ दिवसांत ४ हजार ९५७ टोकणधारक शेतकºयांची  ८६ हजार ३३३ क्विंटल तूर शासकीय खरेदी केंद्रांवर ११ आॅगस्टपर्यंत मोजण्यात आली आहे. अद्यापही ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात तुरीचे मोठ्या ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील शासकीय खरेदी साडे नऊ हजार टोकण शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत गेल्या १५ दिवसांत ४ हजार ९५७ टोकणधारक शेतकºयांची  ८६ हजार ३३३ क्विंटल तूर शासकीय खरेदी केंद्रांवर ११ आॅगस्टपर्यंत मोजण्यात आली आहे. अद्यापही ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. 

गतवर्षीच्या खरीप हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु अपेक्षीत भाव मिळत नसल्याने तूर उत्पादक शेतकºयांत नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे सुरुवातीलाच राज्य शासनाने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत हमी भावाने शासकीय तूर खरेदी सुरू केली. या तूर खरेदीदरम्यान विविध अडचणी आल्यामुळे तरू मोजणीत खोळंबा होऊन अनेक शेतकºयांना टोकण देऊनही त्यांची तूर मोजणे ३१ मे पर्यंतच्या निर्धारित मुदतीत शक्य झाले नाही. अशाच टोकणधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ जुलै रोजी निर्णय जारी करून टोकणाधारक शेतकºयांची तूर ३१ आॅगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मोजून घेण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तूर मोजणी शिल्लक असलेल्या १४ हजार ५४२ टोकणाधारक शेतकºयांची तूर मोजून घेण्यात येत आहे. गेल्या २० दिवसांत जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीरआणि कारंजा या सहाही केंद्रांवर ४ हजार ९५७ टोकणधारकांची ८६ हजार ३३३ क्विंटल तूर मोजण्यात आली आहे. आता उर्वरित १५ दिवसांत प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत शिल्लक असलेल्या ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजून घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे तूर मोजणीला आणखी वेग देण्याची गरज आहे.