शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

६९0 कृषी पंप जोडणी रखडली!

By admin | Updated: January 6, 2016 01:54 IST

विशेष घटक योजने अंतर्गत कृषी समितीच्या ठरावालाही महावितरणकडून केराची टोपली.

संतोष वानखडे / वाशिम: बिलाच्या थकीत रकमेपोटी तातडीने कृषी पंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कर्तव्याच्या बाबतीत मात्र गाढ झोपी असल्याची बाब कृषी पंप जोडणीच्या विलंबाने उजेडात आली आहे. चार वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला विशेष घटक योजनेंतर्गतचा कृषी पंप जोडणीचा ६0 टक्के आकडाही गाठता आला नाही. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्‍या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विशेष घटक योजनेच्या विविध उपक्रमांतर्गत घेतलेल्या विहिरींवर कृषी पंप बसविणे आणि वीजजोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि जिल्हा नियोजन विकास समितीमधून निधीची तरतूद करण्यात आली. २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षात जिल्हय़ातील विशेष घटक योजनेच्या १६५१ लाभार्थींची मोफत कृषी पंप जोडणीसाठी निवड झाली होती. यामध्ये वाशिम तालुक्यातील २४८, मालेगाव १५६, रिसोड ३६६, मंगरुळपीर ३५0, मानोरा २0१ आणि कारंजा तालुक्यातील ३४२ लाभार्थींंचा समावेश आहे. यापैकी ३२ लाभार्थ्यांनी वैयक्तिक स्तरावर यापूर्वी कृषी पंप जोडणी घेतली तसेच १६ लाभार्थ्यांंनी यापूर्वी वीज जोडणीसाठी आवश्यक त्या रकमेचा भरणा केला. परिणामी, १६१९ लाभार्थ्यांंना मोफत कृषी पंप जोडणीचा लाभ देण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली. १६१९ लाभार्थ्यांंमध्ये वाशिम तालुक्यातील २0९, मालेगाव १७३, रिसोड ३५६, मंगरुळपीर ३४९, मानोरा १९९ व कारंजा तालुक्यातील ३३३ लाभार्थींंचा समावेश आहे.