शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गारपिटग्रस्त शेतक-यांसाठी ६८ लाखांची भरपाई !

By admin | Updated: September 27, 2016 03:09 IST

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमध्ये नुकसानग्रस्त ७00 शेतक-यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.

वाशिम, दि. २६- जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च २0१६ मध्ये गारपिट व अवकाळी पावसाने फळपिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाच्यावतीने ७0७ शेतकर्‍यांना ६८ लाख ५0 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी दिली. वाशिम जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. या गारपीटमध्ये रब्बी पिकासह भाजीपाला, फळबागा, कांदा इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ५६८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने या पिक नुकसानाची पाहणी करून शासनाकडे अहवालही पाठविण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गारपिटग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार अमित झनक यांनी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे व राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते, तसेच अंदाजपत्रकीय अधिवेशनातही हा विषय उपस्थित केला होता. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे फळबाग, भाजीपाला, कांदा यांचे सर्व्हेक्षण करुन नुकसानाचा अहवाल शासनास सादर करण्याबात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चाही केली होती. द्विवेदी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्यामार्फत नुकसानाबाबतचा अहवाल शासनास पाठविला. शासनाच्या १३ मे २0१५ च्या निर्णयानुसार एसडीआरएफच्या निकषानुसार शेतकर्‍यांना शेती पिके व फळपिकांच्या नुकसानाबाबत मदत देण्यात यावी यासाठी आमदार झनक यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. ज्या शेतकर्‍यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले अशा शेतकर्‍यांना बागायती क्षेत्राखालील पिकांसाठी १३ हजार ५00 रुपये प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकासाठी १७ हजार रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे. वाशिम जिल्हयातील ३३ टक्के पेक्षा जास्त ४५८ हेक्टर मध्ये नुकसान झाले असून बाधीत शेतकर्‍यांची संख्या ७0७ आहे. त्यात रिसोड तालुक्यातील अंचळ, नेतन्सा, नावली, कोयाळी बु, कळमगव्हाण व केनवड तर मालेगाव तालुक्यातील आमखेडा, दुबळवेल, पिंपळ व मसलाखुर्द या गावाचा सामावेश आहे. वाशिम जिल्हयातील सर्व पात्र शेतकर्‍यांना ६८ लाख ४९ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून तहसिल कार्यालयामार्फत शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. या रकमेमधून कोणत्याही बँकानी वसूली करु नये असे शासनाच्या आदेशात आहे.