शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्ह्यात ६४ हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता ...

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या आढावा सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राऊत यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण करावी. ही कामे पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. पंचायत समिती निहाय कामांचा वेळोवेळी आढावा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा. डिसेंबर २०२१ अखेर बहुतांश योजनांची कामे पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत असल्याने ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. जल जीवन मिशन अंतर्गत ‘रेट्रो फिटिंग’ची कामे वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी दिल्या. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील बोरकर, स्वप्नील राठोड व डी.जी. होळकर उपस्थित होते.

.........................

२८५ गावांमध्ये होणार ‘रेट्रो फिटिंग’

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. चालू वर्षात ५ कोटी २८ लाख रुपये प्राप्त झाले असून प्रगतिपथावरील २३ योजनांसाठी २ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. २८५ गावांमध्ये रेट्रो फिटिंगच्या माध्यमातून ६४ हजार १९७ कुटुंबांना नळजोडणी दिली जाणार आहे. त्यातून प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे साळुंके यांनी सांगितले.