शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

५१ गावांत पोलिस सुरक्षा मोहीम

By admin | Updated: July 25, 2014 00:10 IST

साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्यावतीने ५१ गावात पोलिस सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे.

सिंदखेडराजा : जनसामान्य लोकात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्यावतीने ५१ गावात पोलिस सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे कायदा व सुरक्षा धोक्यात आणणार्‍या अनेक गोष्टींना चाप बसणार आहे. साखरखेर्डा येथे महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्र, बसस्थानक, गुजरी चौक, आठवडी बाजार या वर्दळीच्या ठिकाणी नेहमीच चुटफुट घटना घडतात. फेसबुकवर अश्लील फोटो टाकणे, टिका टिपण्णी करणे, नको तो संदेश लोड करुन धार्मिक भावना भडकावणे, इंटरनेटचा गैरवापर करणे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सिमकार्ड विक्रेत्यांनी खरेदीदार ग्राहकांचे रजिस्टर मेंटन करणे, कित्येक वेळा युवक सिमकार्डचा गैरवापर करुन ते सिमकार्ड वापरानंतर फेकून देतात. त्यामुळे आरोपींना पकडण्यात वेळ लागतो. यासाठी रजिस्टर मेन्टन्स करणे महत्वाचे आहे. एका व्यक्तीला एकच सिमकार्ड बंधनकारक असावे, असाही सूर बैठकीतून निघाला. सण, उत्सव, जयंती या दरम्यान समाज विघातक लोक अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दोन्ही समाजात भावनिक वातावरण लोप पावते. यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रत्येक व्यक्तींनी अशा समाजविघातक व्यक्तींपासून सावध राहून पोलीसांना सुचना द्याव्यात. नेहमीच पुतळा विटंबनाचे प्रकार घडतात. त्यासाठी पुतळा समिती स्थापन करुन प्रत्येकठिकाणी संरक्षण कठडे उभारावे. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घ्यावा, असाही प्रस्ताव मांडण्यात आला. आठवडी बाजार, गुजरी चौक, बसस्थानक याठिकाणी चिडीमारीचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांपासून सावधानता बाळगावी यासाठी ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अपेक्षीत आहे. शिक्षक कॉलनी मेनरोडवर राहणारे नागरिक यांनी आपल्या घरासमोर रात्रीच्यावेळी लाईट लावणे महत्वाचे आहे. या बाबींवर शांतता कमिटी मिटींगमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर भाडेकरुंना घर भाड्याने देतांना त्याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देणे गरजेचे आहे. पोलीस सुरक्षितता मोहिमेसाठी जनतेने सहकार्य करावे. जेणेकरुन कोणत्याही घटनेचा उलगडा त्वरीत होईल, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)