शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास ४१ टक्के पालकांचा होकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST

सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले ...

सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता नववी ते बारावीच्या शाळेची पहिली घंटा वाजली. त्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ८०६ शाळा असून, येथे ८१ हजार ५१८ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत ३,९०१ शिक्षक आणि १,३२८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आतापर्यंत ३,३४१ शिक्षक आणि ९८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली असून, यापैकी ५० शिक्षक आणि १ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ५१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने आणि शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे. याबाबत मुख्याध्यापक, शिक्षक हे पालकांशी संवाद साधत असल्याचे दिसून येते. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, तीन दिवसांतच ४१ टक्के अर्थात ३३ हजार ४२२ पालकांनी संमतीपत्र दिले आहे.

०००

एकूण शाळा ८०६

शाळा सुरू ७८४

एकूण विद्यार्थी ८१,५१८

उपस्थित विद्यार्थी ३४,४२२

एकूण शिक्षक ३,९०१

कोरोना चाचणी ३,३४१

पॉझिटिव्ह ५०

एकूण शिक्षकेतर कर्मचारी १,३२८

कोरोना चाचणी ९८७

पॉझिटिव्ह १

००००००००००००

शाळांमध्ये कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार अंमलबजावणी केली जात असून, पालकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती कमी करण्याचे प्रयत्न शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व शिक्षकांतर्फे केले जात आहेत.

- अंबादास मानकर

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम

०००

शाळेमध्ये कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी केली जात असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पालकांशी संवाद साधून अधिकाधिक संमतीपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच शाळेत प्रवेश दिला जात असून, एका बेन्चवर एक विद्यार्थी बसविण्यात येत आहे.

- हेमंत तायडे

मुख्याध्यापक, जि. प. शाळा, जांभरूण नावजी