शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

जिल्ह्यातील ३५१ युवकांना मिळाला रोजगार

By admin | Updated: May 18, 2017 01:17 IST

ग्रामीण कौशल्य विकास योजना : विनामुल्य प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचा एक भाग म्हणून राबविणाऱ्या येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत गोरगरीब युवकांना तीन महिने विनामुल्य प्रशिक्षण मिळत आहे. या प्रशिक्षणातून रोजगारासाठी सक्षम ठरलेल्या जिल्ह्यातील ३१५ युवकांना गत वर्षभरात विविध क्षेत्रात रोजगार मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ती अभियानाचाच एक भाग म्हणून दीन दयाळ उपाध्याय - ग्रामीण कौशल्य विकास योजना ही महत्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली आहे. ग्रामीण भागातील १८ ते ३५ वयोगटातील युवकांची मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना विविध संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलन करण्याबरोबरच दहावी उत्तीर्ण असलेल्या गोरगरीब युवक-युवतींना संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट दिले जाते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील युवक-युवती, स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांच्या कुटुंबातील युवक-युवती किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस काम केलेल्या लाभार्थींचा मुलगा-मुलगी या योजनेसाठी पात्र आहेत. पात्र युवक-युवतींसाठी पंचायत समिती स्तरावर मेळावा घेऊन तीन महिने मुदतीच्या विनामुल्य प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. वाशिम जिल्ह्यात रोजगार व प्रशिक्षण देण्यासाठी तीन संस्थांची निवड शासनातर्फे झाली असून, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३१५ जणांना ‘रोजगार’ देण्याचे उद्दिष्ट होते. मंगरूळपीर पंचायत समितीने सर्वप्रथम पुढाकार घेत ११२ युवक-युवतींना प्रशिक्षित केले. या ११२ जणांनादेखील विविध संघटित क्षेत्रात वेतनी रोजगार मिळाला आहे. उर्वरीत २०३ युवक-युवती हे पाच पंचायत समिती क्षेत्रातील आहेत. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाला सुरूवात होत नाही; तोच मंगरूळपीर पंचायत समितीने मेळावा घेऊन ५८ युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड केली. या सर्वांना तीन महिने विनामुल्य प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर विविध संघटित क्षेत्रात वेतनी रोजगार मिळेल, अशी माहिती मंगरूळपीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) भाऊसाहेब बेलखेडकर यांनी दिली. असे आहे तीन महिने विनामुल्य प्रशिक्षणग्रामीण भागातील पात्र युवक-युवतींना शासनातर्फे तीन महिन्यांचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. इंग्रजीसह मु्ख्य भाषेचे पायाभूत ज्ञान, युवकांमधील विविध कौशल्य क्षमतेचा विकास करणे, क्षमता बांधणी, संभाषण कौशल्य, व्यावहारिक ज्ञान आदींसंदर्भात दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. एक महिन्याचे प्रशिक्षण हे संबंधित संघटित क्षेत्रातील कंपनीमध्ये ‘आॅन दि स्पॉट’ या पद्धतीने दिले जाते. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो. या प्रशिक्षणातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३१५ जणांना वेतनी रोजगार मिळाला आहे.