शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

२५ जणांना अन्नातून विषबाधा

By admin | Updated: May 9, 2017 02:17 IST

दोघींची प्रकृती चिंताजनक : सकाळी शिजवलेले अन्न सेवन केले सायंकाळी.

मंगरूळपीर : तालुक्यातील फाळेगाव येथे सोमवार, ८ मे रोजी २५ महिला-पुरुषांना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णांना आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी, की फाळेगाव येथे ७ मे रोजी एका लग्न समारंभात भोजनासाठी शिजविण्यात आलेले शिल्लक राहिलेले अन्न त्याच दिवशी सायंकाळी काही लोकांनी सेवन केले. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली. दरम्यान, संबंधिताना संडास, उलटीचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे उपचारासाठी सर्वांना आसेगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना पुढील उपचारासाठी वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले असून, इतर २३ रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये दुर्गेश राऊत, लीला भोयर, अश्‍विनी व्यवहारे, मैना महल्ले, गजानन व्यवहारे, विमल व्यवहारे, गणेश सुर्वे, लक्ष्मी सुर्वे, प्रतिक व्यवहारे, संगिता व्यवहारे, ज्ञानेश्‍वर व्यवहारे, रुपाली ठाकरे, आरती ठाकरे, गीता व्यवहारे, शीतल गावंडे, दुर्गा व्यवहारे, नथ्थू व्यवहारे, तेजश्री मुळे, मीरा व्यवहारे, केशव व्यवहारे, लक्ष्मी व्यवहारे, रमाकांत व्यवहारे, पुनम कुटे, कल्पना व्यवहारे यांचा समावेश आहे.