शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जुन्या नोटांवर झाली १.९७ कोटी रुपयांची करवसूली!

By admin | Updated: November 12, 2016 21:48 IST

बंद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकारून नगर पालिकेचा कर आणि विद्यूत देयक भरून घेण्यास मुभा देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
वाशिम, दि. १२ - बंद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकारून नगर पालिकेचा कर आणि विद्यूत देयक भरून घेण्यास मुभा देण्यात आली आहे. यानुषंगाने गत दोन दिवसांत करवसूली आणि वीज देयकापोटी तब्बल १ कोटी ९७ लाख ३८ हजार रुपयाची वसूली झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, १२ नोव्हेंबरला दिली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेनंतर अचानकपणे भारतीय चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे ९ नोव्हेंबरच्या सकाळपासूनच नागरिकांची बंद झालेल्या नोटा बँकेत ‘डिपॉझिट’ करण्यासाठी ‘धांदलघाई’ सुरू झाली, ती सलग चौथ्या दिवशी अर्थात शनिवार, १२ नोव्हेंबरलाही कायम असल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, चलनातून आणि व्यवहारातून रद्द ठरविण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा देवून नागरिक त्यांच्याकडे असलेली नगर पालिका कराची थकबाकी, जलसंपदा विभागाकडून आकारली जाणारी सिंचन पाणीपट्टी, महावितरणची विद्यूत देयके, पंचायत विभागाशी संबंधित गौणखनिज, घरपट्टी, नळ पट्टी, वीज पट्टी आदिंचा भरणा करण्याची मूभा देण्यात आली आहे.
 
१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांकडून जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्विकारून त्या-त्या विभागांनी कर भरणा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. 
 
तथापि, जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर या चार नगर परिषदा आणि मानोरा, मालेगाव या दोन नगर पंचायतीअंतर्गत ११ नोव्हेंबरला एकाच दिवशी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची करवसूली झाली. त्यात वाशिम नगर परिषदेचा आकडा सर्वाधिक ५३ लाख रुपये आहे. त्यापाठोपाठ रिसोड नगर परिषदेने आतापर्यंत २२ लाख रुपये करवसूली केली असून कारंजा नगर परिषदेने १६ लाख रुपये कर वसूल केला.
 
मंगरूळपीर नगर पालिका यातुलनेत माघारली असून दोन दिवसांत या पालिकेने ४ लाख रुपयांच्या आसपास कर वसूली केली आहे. मालेगाव नगर पंचायतमध्ये नागरिकांनी दोन दिवसांत १० लाख रुपये कराचा भरणा केला असून मानोरा नगर पंचायतने १ लाख रुपये करवसूली केल्याची माहिती आहे.
 
बाजार समित्या बंद ठेवू नका - जिल्हा उपनिबंधक
 
जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच खाजगी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, अशाप्रकारे बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार समितीमधील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरु करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले. शेतमालास रास्त भाव मिळावा, शेतकºयांना सोयी-सुविधा पुरविणे व त्यांना येणाºया अडीअडचणी सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली आहे. केंद्रशासनाने देशहिताच्या दृष्टीने ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे कारण पुढे करून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची खरेदी विक्री बंद ठेवणे योग्य नाही. शेतमाल खरेदी विक्रीची रक्कम शेतकºयांना धनादेशाद्वारे अदा करा, असे आवाहन खाडे यांनी केले.