शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

रुग्णवाहिका सेवेचा १.८४ लाख रुग्णांना लाभ

By admin | Updated: April 24, 2015 02:01 IST

असा घेता येतो रुग्णवाहिकेचा लाभ.

संतोष वानखडे/वाशिम: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गतच्या रुग्णवाहिकेने २0१४-२0१५ या वर्षात राज्यातील एक लाख ८४ हजार रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवून जीवनदान दिले आहे. राज्यभरातून दोन लाख कॉल नियंत्रण कक्षाला आले होते, हे विशेष! गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी राज्यात २६ जानेवारी २0१४ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू झाली आहे. राज्यात कोठूनही १0८ या टोल फ्री क्रमांकावर फोन केला की तातडीने मोफत रुग्णवाहिका घरपोच येते. राज्यभरात प्रत्येक ३0 ते ४0 किलोमीटर अंतरावर या सुसज्ज अँम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) तैनात करण्यात आलेल्या आहेत. अँडव्हान्स लाईफ सेव्हिंग सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सेव्हिंग सपोर्ट, अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या या अँम्ब्युलन्स आहेत. एएलएस अँम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास तातडीचे उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. घर ते हॉस्पिटलदरम्यान या अँम्ब्युलन्समध्ये उपचार केला जातो. या अँम्ब्युलन्समध्ये कार्डियाक मॉनिटर, डिफिब्रिलेटर मशीन, सिरिंज पंप, व्हेंटिलेटर, ईसीजी मशीन, अँम्ब्युबॅग, पल्स ऑक्सिमीटर, इलेक्ट्रिकल सक्शन मशीन, इर्मजन्सी डिलेवरी किट, इंट्युबेशन किट, ऑक्सिजन सिलिंडर आदी आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. बेसिक लाईफ सेव्हिंग सपोर्ट अँम्ब्युलन्सचा वापर हा घात, अपघातातील जखमी, जळीत रुग्ण, प्रसूती वेदना होत असलेल्या स्त्रिया, विषबाधा, सर्पदंशाच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी केला जातो. २0१४-१५ या वर्षात राज्यभरातील एक लाख ८४ हजार ३९0 रुग्णांनी या मोफत रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. यामध्ये हृदयविकाराचे १९७८ रुग्ण, अपघातग्रस्त २६ हजार ८८९, प्रसुती ५२ हजार ४५३ तर इतर एक लाख तीन हजार ७0 रुग्णांचा समावेश आहे.