शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

१५३ नमुने आढळले दूषित, पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST

पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासह भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेने पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांतील जलस्रोत ...

पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासह भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेने पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांतील जलस्रोत शुद्धीकरण करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. क्लोरिनेशन आणि क्लोरिनवॉश ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य उपकेंद्रांतर्गत तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साथरोग औषधी कीट ठेवण्याच्या योजनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत. शिवाय, जोखीमग्रस्त नदीकाठच्या गावांत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित सर्वेक्षणाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील पंधरा दिवस क्लोरिनेशन आणि क्लोरिनवॉक विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

----------------

तालुकानिहाय नमुने

-----

वाशिम -

नमुने घेतले-१३५

दूषित नमुने- ३९

--------

मालेगाव

नमुने घेतले- ११०

दूषित नमुने-१४

------------

रिसोड -

नमुने घेतले- १२९

दूषित नमुने-१७

---------

मानोरा-

नमुने घेतले- १०१

नमुने दूषित - २७

-----------

मंगरुळपीर-

नमुने घेतले- १०१

नमुने दूषित - २८

------------------

कारंजा

नमुने घेतले- १०१

नमुने दूषित - २८

-----------------

ज्या गावांत तपासणीच झाली नाही त्यांचे काय?

१) पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून जलस्त्रोतांतील पाण्याच्या योग्य तपासण्यासाठी नमुन्यांचे संकलन केले जाते. यासाठी संबंधित यंत्रणेला नमुने घेण्याच्या सूचनाही केल्या जातात

२) वाशिम येथील जिल्हा प्रयोगशाळेसह मालेगाव आणि मानोरा येथील उपविभागीय प्रयोगशाळेकडून यंदाही १ जुलै ते ९ जुलैदरम्यान पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६७७ नमुने तपासण्यात आले.

३) अनेक गावांतून नमुनेच प्राप्त झाले नाहीत. त्या गावांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची माहिती देण्यात येत असून, या गावांत जलसुरक्षक, ग्रामसेवक, महिला बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

------------------------

कोरोनामुळे नमुने घटले

१) गत वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला असून, ग्रामीण भागांतही त्याचे पडसाद दिसून येत आहेत.

२) स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच ग्रामीण भागांतील विविध यंत्रणांच्या कामावर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच पावसाळ्याच्या दिवसांत तपासणीसाठी नमुन्यांच्या संकलनावरही परिणाम झाला.

३) गतवर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पाणी नमुन्यांचे संकलन करणे कठीण झाले. या काळात जिल्ह्यातून पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळांना प्राप्तच झाले नाहीत.

----------------------

शहरी भागांत १० ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

१) १३५-ठिकाणचे नमुने घेतले

२)०१ - नमुने दूषित आढळले

३) १३४ - नमुने चांगले आढळले

-------------

१) शहरी भागांत नगर परिषद, नगर पंचायतींच्या पाणी पुरवठा विभागाकडून नमुन्यांचे संकलन करण्यात आले.

२) सहा तालुक्यांतून १८० नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले होेते. त्यापैकी १७० नमुने चांगले, तर १० नमुने दूषित आढळले.

----------------

आजारी पडायचे नसेल, तर पाणी उकळून प्या

१) पावसाळ्यात जलजन्य आजार उद्‌भवतात. उलटी, जुलाब असे आजार होतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

२) आजारी पडायचे नसेल, तर पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यातील दूषितपणा नाहीसा होतो.

३) खाद्यपदार्थ उघडे ठेवू नयेत. माशा बसून आजार होऊ शकतात. शिवाय, शिळे अन्नही खाऊ नये. ताजे गरम अन्न खावे.

४) जीएसडीए लॅबमध्ये १६७५ नमुने तपासण्यात आले. त्यात २८६ नमुने दूषित आढळले, तर जिल्हा लॅबमध्ये १६९९ पैकी १९४ नमुने दूषित आढळले आहेत.