शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींचे अनुदान रखडले

By admin | Updated: September 7, 2015 01:41 IST

सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभापासून वाशिम जिल्ह्यातील १0 हजार शेतकरी वंचित.

वाशिम : अवर्षणप्रवण क्षेत्रात २00५ पासून समाविष्ट करण्यात आलेल्या वाशिम जिल्हय़ामध्ये विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत २0१४-१५ या वर्षात ऑनलाईन अर्ज केलेल्या दहा हजार शेतकर्‍यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी आवश्यक असलेले १५ कोटी १२ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे जिल्हय़ाच्या सिंचन अनुशेषात वाढ होत असून, शेतकर्‍यांना हे अनुदान त्वरेने उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वास्तविक या योजनेच्या पूर्ततेमध्ये वाशिम जिल्हा एक वर्षाने मागे असून गतवर्षीचेचे हे अनुदान रखडलेले आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षात अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांच्या अनुदानाचाही प्रश्न निर्माण होत आहे. अवर्षण, अतवृष्टी, गारपीट आणि अनियमित पाऊस यामुळे आधीच अवर्षण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी पिचले आहेत. या शेतकर्‍यांना विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहे; मात्र जिल्हय़ातील अर्ज केलेल्या या शेतकर्‍यांना हे अनुदान न मिळाल्याने योजनेंतर्गत जमीन सिंचनाखाली आणण्याच्या उद्दिष्टाला परिणामी खो बसत आहे. ठिबक व तुषार संचासाठी जिल्हय़ातील नऊ हजार ७४६ शेतकर्‍यांनी गतवर्षी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यासाठी शेतकर्‍यांना १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत मिळणे अपेक्षित होते. २0१५-१६ हे अर्धे आर्थिक वर्ष उलटून गेल्यानंतरही ते शेतकर्‍यांना मिळालेले नाही. या निधीपैकी पहिल्या टप्प्यात केवळ एक कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान काय ते मिळालेले आहे. मात्र १५ कोटी १२ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही रखडलेले आहे. यामध्ये ठिबक संचासाठी एक हजार ६६४ शेतकर्‍यांना चार कोटी १६ लाख रुपये आणि तुषार संचासाठी (स्प्रिंकलर) आठ हजार ८२ शेतकर्‍यांसाठी १२ कोटी १२ लाख ३0 हजार रुपये असे १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान हवे आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातंर्गत त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर शासनाकडे तसी मागणीही केल्या गेली आहे; मात्र एक कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचे तुटपुंजे अनुदान वगळता अद्याप शासनाकडून निधीच यासाठी दिला गेला नसल्याचे वास्तव आहे.