शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शिधापत्रिका नूतनीकरण, विभक्तीकरणाची १२०० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

गतवर्षापर्यंत राज्यात शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे प्रलंबित होती. हा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणेने तत्काळ प्रकरणे निकाली ...

गतवर्षापर्यंत राज्यात शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे प्रलंबित होती. हा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणेने तत्काळ प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले होते. शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरण व गरजूंनी अर्ज केल्यानंतर त्यांना नव्याने शिधापत्रिका देण्यासंदर्भात झालेल्या कार्यवाहीचा पुरवठा विभागाच्या उपायुक्तांकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जातो. त्यावरून एकत्रित माहिती शासनाला कळविण्यात येत असते. असे असताना काही तालुक्यांकडून माहिती पाठविली जात नसल्याचे शासनाच्या लक्षात आले होते. दरम्यान, राज्यातील पात्र नागरिकांना नवीन शिधापत्रिका देणे, जीर्ण शिधापत्रिका असल्यास दुय्यम शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकांमधील नावे टाकणे किंवा वाढविणे आदींसाठी कालमर्यादा विहित करण्यात आली आहे. त्याचे पालन करून वाशिम तहसील विभागाच्या पुरवठा विभागाने गेल्या ६ महिन्यांत प्रलंबित १२०० पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढलेली आहेत. त्यात नवीन केशरी कार्ड तयार करून देण्याचे ७६६ प्रस्ताव, नवीन शुभ्र शिधापत्रिकेचे ६०, दुय्यम केशरीचे १०९, दुय्यम पिवळीचे ६७ प्रस्ताव निकाली निघाले असून, ११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली; तर ७० जणांची नावे शिधापत्रिकांमधून कमी करण्यात आली. विभक्तीकरणाची ६० प्रकरणेदेखील निकाली काढण्यात आली आहेत.

...................

कोट :

वाशिम तहसील कार्यालयाकडे सद्य:स्थितीत शिधापत्रिका नूतनीकरण किंवा विभक्तीकरणाचे एकही प्रकरण प्रलंबित राहिलेले नाही. गेल्या सहा महिन्यांत १२०० पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ज्या लाभार्थींना यासंबंधी अडचण जाणवत असेल त्यांनी प्रस्ताव दाखल करावे. तत्काळ दखल घेतली जाईल.

- निलेश राठोड

पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, वाशिम