शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी जिल्ह्यात होणार १०० ‘ऑर्गनिक युनिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रीय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारण १२ ते १८ टक्के सेंद्रीय कर्ब असलेली शेतजमीन सुपिक मानली जाते. ...

जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रीय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारण १२ ते १८ टक्के सेंद्रीय कर्ब असलेली शेतजमीन सुपिक मानली जाते. सेंद्रीय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत राहण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते. तथापि, जिल्ह्यात गत काही वर्षांत शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांसह रासायनिक कीटकनाशकाचा वारेमाप वापर होत आहे. त्यामुळे जमिनीतील मूळ सेंद्रीय कर्बांचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, शेती उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. ही प्रक्रिया पुढे, अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यातील शेती नापिक होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतजमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट स्थापन करण्याची योजना आखली आहे. जिल्ह्यातील १०० शेतकरी गटांना हे ऑर्गनिक युनिट दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

कृषी विभाग देणार प्रशिक्षण

जिल्ह्यात सेंद्रीय कर्ब निर्मिती करण्यासाठी प्रस्तावित ऑर्गनिक युनिटची संकल्पना यशस्वी व्हावी आणि शेतकऱ्यांचा त्याचा फायदा व्हावा म्हणून कृषी विभाग शेतकरी गटांना ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएचडी आदिंसह सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी आवश्यक कल्चर तयार करण्याबाबत प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणानंतर ऑर्गनिक युनिटमध्ये निर्मित केले जाणारे सेंद्रीय कर्बाचे कल्चर शेतकऱ्यांना अल्प किमतीत वितरित करून त्याआधार सेंद्रीय कर्ब निर्मिती करण्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

---------------

१० ग्रॅम कल्चरपासून होणार १० किलो सेंद्रीय कर्ब

शेतजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या ऑर्गनिक युनिटमधून शेतकऱ्यांना १० ग्रॅम कल्चर अवघ्या १० रुपयांत घेता येणार आहे. या दहा ग्रॅमपासून शेतकरी एका एकरासाठी लागणारे १० किलो सेंद्रीय कर्ब तयार करून त्याचा शेतीजमिनीसाठी वापर करू शकणार आहेत. बाजारात १५० रुपये प्रती किलो दराने मिळणारे सेंद्रीय कर्ब अवघ्या १० रुपयांत तयार करण्याबाबत शेतकरी गटांकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

------------------

रायझोबियम

कोट: रासायनिक खताच्या वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीची सुपिकता घटली आहे. त्यामुळे सेंद्रीय कर्ब वाढविण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यासाठी ऑर्गनिक युनिट अर्थात सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी लघु प्रयोगशाळा उभारण्याची तयारी आहे. जिल्ह्यातील शंभर शेतकरी गटांना या प्रयोगशाळा दिल्या जातील. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नीती आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम