शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जि.प. विद्यार्थ्यांच्या गणवेश पुरवठ्यामध्ये गैरव्यवहार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:22 IST

निकृष्ट दर्जाचे कापड : ई-निविदेद्वारे खरेदीची मागणी

हितेन नाईक

पालघर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या गणवेश पुरवठ्यामध्ये मोठा गैरव्यवहार होऊन विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे कापड वापरून गणवेश दिले जात आहेत. यामुळे जिल्हास्तरावर ई-निविदेद्वारे खरेदी करून विद्यार्थ्यांना योग्य गणवेश पुरवठा व्हावा, अशी मागणी केली जात आहे.

जिल्हा परिषदअंतर्गत लाखो विद्यार्थ्यांना समग्र शिक्षाअंतर्गत प्रत्येक वर्षी प्रति विद्यार्थी दोन गणवेशांचा पुरवठा करण्यात येतो. प्रति गणवेश तीनशे रुपयांचे अनुदान प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जात असून दोन गणवेशासाठी एकूण सहाशे रुपये प्रति विद्यार्थी अनुदान शासनाकडून प्राप्त होते. गणवेश पुरवठा करण्याकामी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून निधी वितरीत करण्यात येतो व तेथून हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केला जातो. गणवेश खरेदीचे सर्व अधिकार हे त्या त्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना प्रदान करण्यात आले असून या दोघांच्या संमतीने गणवेश खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र या गणवेश वितरणाच्या प्रक्रियेत स्थानिक व्यापारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे कापड खरेदी केले जात असल्याचा संशय जव्हार नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते दीपक कांगणे यांनी व्यक्त केला आहे. कापडाचा दर्जा निकृष्ट असल्याने पहिल्या धुण्यातच त्यांच्या गणवेशावर गोळे निर्माण होत कापड निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. हे गणवेश दोन ते तीन महिन्यातच फाटण्याच्या अवस्थेत पोचत असून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेष मिळावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कांगणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, ई-निविदेद्वारे कापड खरेदीची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांच्याकडे केली असल्याचे कांगणे यांनी सांगितले.गणवेशाच्या कपडा खरेदीसाठी जो व्यापारी जास्त टक्केवर देईल, त्याच्याकडून गणवेशाचे कापड खरेदी केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या गैरव्यवहारात हे व्यापारी प्रति गणवेश ५० रुपये ते ८० रुपये कमिशन काही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचे आमिष दाखवितात. यामुळे एका विद्यार्थ्यामागे १०० ते १६० रुपये कमिशन दिले जात असल्याचे कांगणे यांनी उपाध्यक्षांकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.योजनेचा लाभ ५९ हजार विद्यार्थ्यांनाजि.प.च्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत २०१९-२० मध्ये पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड व वाडा या आठ तालुक्यांत एकूणएक लाख ५९ हजार ६३९ विद्यार्थ्यांना गणवेश योजनेचा लाभ देण्यात आला होता.मागील वर्षी ९,२८,0३,२०० रु. इतका खर्च गणवेशावर केला. या खरेदीत प्रति विद्यार्थी भ्रष्टाचार पकडला तर १ कोटी ६० लाख ते २ कोटी ५६ लाखांची बचत होऊ शकली असती, असा दावा कांगणे यांनी केला आहे.गणवेश खरेदी प्रक्रिया एकाच छत्रछायेखाली व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. एक निश्चित धोरण ठरवले गेले असते तर विद्यार्थ्यांना साहित्य देता आले असते.- नीलेश गंधे, माजी उपाध्यक्ष, जि.प. पालघर

टॅग्स :palgharपालघरzp schoolजिल्हा परिषद शाळा