शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जि.प. विद्यार्थ्यांच्या गणवेश पुरवठ्यामध्ये गैरव्यवहार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:22 IST

निकृष्ट दर्जाचे कापड : ई-निविदेद्वारे खरेदीची मागणी

हितेन नाईक

पालघर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या गणवेश पुरवठ्यामध्ये मोठा गैरव्यवहार होऊन विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे कापड वापरून गणवेश दिले जात आहेत. यामुळे जिल्हास्तरावर ई-निविदेद्वारे खरेदी करून विद्यार्थ्यांना योग्य गणवेश पुरवठा व्हावा, अशी मागणी केली जात आहे.

जिल्हा परिषदअंतर्गत लाखो विद्यार्थ्यांना समग्र शिक्षाअंतर्गत प्रत्येक वर्षी प्रति विद्यार्थी दोन गणवेशांचा पुरवठा करण्यात येतो. प्रति गणवेश तीनशे रुपयांचे अनुदान प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जात असून दोन गणवेशासाठी एकूण सहाशे रुपये प्रति विद्यार्थी अनुदान शासनाकडून प्राप्त होते. गणवेश पुरवठा करण्याकामी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून निधी वितरीत करण्यात येतो व तेथून हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केला जातो. गणवेश खरेदीचे सर्व अधिकार हे त्या त्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना प्रदान करण्यात आले असून या दोघांच्या संमतीने गणवेश खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र या गणवेश वितरणाच्या प्रक्रियेत स्थानिक व्यापारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे कापड खरेदी केले जात असल्याचा संशय जव्हार नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते दीपक कांगणे यांनी व्यक्त केला आहे. कापडाचा दर्जा निकृष्ट असल्याने पहिल्या धुण्यातच त्यांच्या गणवेशावर गोळे निर्माण होत कापड निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. हे गणवेश दोन ते तीन महिन्यातच फाटण्याच्या अवस्थेत पोचत असून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेष मिळावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कांगणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, ई-निविदेद्वारे कापड खरेदीची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांच्याकडे केली असल्याचे कांगणे यांनी सांगितले.गणवेशाच्या कपडा खरेदीसाठी जो व्यापारी जास्त टक्केवर देईल, त्याच्याकडून गणवेशाचे कापड खरेदी केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या गैरव्यवहारात हे व्यापारी प्रति गणवेश ५० रुपये ते ८० रुपये कमिशन काही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचे आमिष दाखवितात. यामुळे एका विद्यार्थ्यामागे १०० ते १६० रुपये कमिशन दिले जात असल्याचे कांगणे यांनी उपाध्यक्षांकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.योजनेचा लाभ ५९ हजार विद्यार्थ्यांनाजि.प.च्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत २०१९-२० मध्ये पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड व वाडा या आठ तालुक्यांत एकूणएक लाख ५९ हजार ६३९ विद्यार्थ्यांना गणवेश योजनेचा लाभ देण्यात आला होता.मागील वर्षी ९,२८,0३,२०० रु. इतका खर्च गणवेशावर केला. या खरेदीत प्रति विद्यार्थी भ्रष्टाचार पकडला तर १ कोटी ६० लाख ते २ कोटी ५६ लाखांची बचत होऊ शकली असती, असा दावा कांगणे यांनी केला आहे.गणवेश खरेदी प्रक्रिया एकाच छत्रछायेखाली व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. एक निश्चित धोरण ठरवले गेले असते तर विद्यार्थ्यांना साहित्य देता आले असते.- नीलेश गंधे, माजी उपाध्यक्ष, जि.प. पालघर

टॅग्स :palgharपालघरzp schoolजिल्हा परिषद शाळा