शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कुडूस नाक्यावर युवासेनेचा चक्का जाम

By admin | Updated: October 27, 2015 00:03 IST

भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही या रस्त्यासाठी टोल आकारला जात आहे.

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही या रस्त्यासाठी टोल आकारला जात आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाके बंद करावेत, या मागणीसाठी युवासेनेने सोमवारी कुडूस नाका येथे चक्का जाम छेडीत प्रशासनाला जाब विचारला. या वेळी एक तास महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी केले. भिवंडी-वाडा-मनोर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका शासनाने बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला दिला आहे. त्यासाठी २२ महिन्यांचा कालावधी कंपनीला दिला होता. मात्र, चार वर्षे उलटूनही रस्त्याचे काम अपूर्ण तर आहेच, पण झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. या खराब कामामुळे येथे नित्याचीच वाहतूककोंडी होत असते. तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक अपघात झाले असून आतापर्यंत ३०० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप या वेळी शिवसेनेने केला.या आंदोलनाची दखल वाड्याचे तहसीलदार संदीप चव्हाण यांनी घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण व निकृष्ट कामाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून त्या बाबतीत कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तर, ३१ तारखेपर्यंत टोल बंद न केल्यास १ तारखेला शिवसैनिक हातात कायदा घेऊन टोल नाके बंद करतील, असा गंभीर इशारा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनात शिवसेनेचे नेते निलेश गंधे, सुनील पाटील, चंद्रकांत पष्टे, कांतिलाल देशमुख, सचिन पाटील, प्रकाश केणे, निलेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष छाया भोईर, जि.प. सदस्या भारती कामडी, माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या म्हसकर, अजिंक्य पाटील आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. या वेळी सुप्रीम कंपनीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. (वार्ताहर)