शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कष्टकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; शासनाविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:24 IST

आदिवासींचा वनहक्क डावलल्याचा निषेध

पालघर : वनहक्क कायद्यान्वये आदिवासींना जंगलात राहण्याचा हक्क देण्यात आला असून हा हक्क नाकारून त्यांची राहती घरे तोडण्याच्या नोटिसी बजावल्या जात आहेत. या अन्यायाविरोधात कष्टकरी संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

‘आदिवासींची तोडली झोपडी, वन खात्याची फिरली खोपडी’, ‘आदिवासी जिल्ह्यात झाले काय - महाराष्ट्र शासन हाय हाय’, अशा घोषणा देत कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आदींच्या नेतृत्त्वाखाली हजारो आदिवासींचा मोर्चा पालघर रेल्वे स्थानकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

पालघर जिल्ह्यात काही महिन्यांपासून आदिवासींच्या वन हक्कांचे उल्लंघन होत असून आदिवासींना त्यांच्या वनजमिनी वरून हटवले जात आहे. जव्हार वन विभागाने आदिवासींना त्यांच्या फॉरेस्ट प्लॉटवर बांधलेल्या घरातून आणि झोपड्यांतून हटवण्याची मोहीम हाती घेतली असून एप्रिल २०१९ मध्ये अशाच प्रकारचे एक घर जेसीबी मशीनचा वापर करून तोडण्यात आले आहे. एप्रिल २०१९ मध्ये प्लॉटधारकांचा दावा प्रलंबित असूनही वनखात्याने या प्लॉटवरील घर जमीनदोस्त करून वन हक्क कायद्याच्या कलम ४ (५) उल्लंघन केले आहे. आदिवासींचे वनहक्क कायद्यांतर्गत मान्य झालेले हक्क उपभोगण्यापासून अडथळा निर्माण केल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ (२०१६ च्या सुधारणा सहित) च्या कलम (३)(१)(छ) नुसार तो अत्याचार ठरतो व त्यास जबाबदार असणारी व्यक्ती सदर कलमांतर्गत कारवाईस पात्र असल्याचेही ब्रायन लोबो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोणत्याही आदिवासी पाड्यांमध्ये गावठाण क्षेत्र न वाढवता आदिवासींची फॉरेस्ट प्लॉटवर घरे तोडणे हे अन्यायकारक असून आदिवासींच्या जगण्याच्या हक्काचे उल्लंघन असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. वन खात्याने भारतीय वन कायदा १९२७ मध्ये सुचिवलेल्या प्रस्तावित सुधारणामुळे आदिवासींचे वनहक्क यामुळे हिरावून घेतले जात आहेत. आधीपासूनच बलशाली असणाºया वनखात्याच्या नोकरदारांना यामुळे आणखी शक्ती मिळणार आहे. यामुळे खाजगीकरणाचा मार्ग खुला करून राष्ट्रीय संपत्तीचे रूपांतर खाजगी नफ्या करता येणे शक्य असल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली. याच्या निषेधार्थ संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.काय आहेत मागण्या

  • फॉरेस्ट प्लॉटवरील आदिवासींच्या घरांची मोडतोड थांबविण्यात यावी.
  • भारतीय वनहक्क कायद्यामध्ये सुचवलेल्या प्रस्तावित सुधारणा मागे घेण्यात याव्यात.
  • आदिवासी पाड्यांमध्ये नवीन गावठाण घोषित करण्यात यावे किंवा असलेले गावठाण क्षेत्र वाढविण्यात यावे.
  • वनहक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि सर्व प्रलंबित दावे तसेच अपील मंजूर करण्यात यावे.
  • जिल्हा कन्व्हर्जन समिती वन संसाधन क्षेत्राच्या व्यवस्थापनामध्ये पूर्णपणे कुचकामी ठरली असल्यामुळे या समितीची बैठक बोलविण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना देण्यात आले.