शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोपारा खाडीपुलाचे काम सुरू, अनेक महिने ऐरणीवर आणला होता प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:58 IST

नायगाव रेल्वे स्टेशन आणि जूचंद्र या दोन भागांना जोडणारा सोपारा खाडी पूलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

नालासोपारा : नायगाव रेल्वे स्टेशन आणि जूचंद्र या दोन भागांना जोडणारा सोपारा खाडी पूलाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम लाल फितीच्या कारभारात अडकून पडले होते. अनेकदा आश्वासने देऊनही पूल खुला होत नसल्याने शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पीडब्ल्यूडी प्रशासनाने पुलाचे थातुरमातूर काम करून राजकीय पक्ष तथा नागरिकांची नाराजी दूर करण्याचे काम केले होते. मात्र त्यानंतरही पुलाच्या कामात काहीच सातत्य नव्हते. वसई-विरार शहर महानगरपालिकेने पुलाच्या कामासाठी १ कोटी १ लाख ७४ हजार रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी फक्त २० लाखांची रक्कम महापालिकेने पुलाच्या कामासाठी दिली आहे.मध्यंतरी सोपारा खाडी पुलाच्या बांधकामाला दिरंगाइ का होत आहे, याची विचारणा केली असता उपस्थित अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडून येणारा निधी मिळाला नसल्याने बांधकाम रखडल्याची धक्कादायक माहिती दिली होती. पुलाचे बांधकाम रखडले आहे म्हणून भरीव निधीची तरतूद करून देणाºया महापालिकेने केवळ फक्त २० लाखांची रक्कम देऊन उर्वरीत ८१ लाख ७४ हजार रूपयांची रक्कम थकवल्याने महापालिकेचा खरा चेहरादेखील समोर आला होता. पुलाच्या कामाला अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी याआधीदेखील शिवसेनेने पीडब्ल्युडी प्रशासनाला घेरले होते. त्यात अधिकाऱ्यांनी २७ मे २०१९ पर्यंत पूल खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २७ म गेला तरी तसे घडलेले नाही.>लेखी आश्वासनामुळे शिवसेनेचे आंदोलन स्थगितयाच कालावधीत शिवसेनेचे ग्रामिण तालुका प्रमुख जगन्नाथ म्हात्रे यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. २७ मे रोजी शिवसेना करत असलेल्या आंदोलनाची दखल घेत पीडब्ल्यूडी प्रशासनाने सोपारा खाडी पुल लवकरच खुला करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन शिवसेना पदाधिकाºयांना दिल्याने सेनेच्या दणक्याने पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शिवसेनेने सोमवारी छेडण्यात येत असलेले धरणे आंदोलन स्थगित केले आहे.>पुलाच्या संरचनेमुळे फेरबदल झाल्याने काम खोळंबलेनायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया रेल्वे उड्डाणपूलाचा पोहोचमार्ग येत असल्याने सा.बां. विभागास जूचंद्र बाजूकडील पोहोचमार्गाच्या आखणीमध्ये बदल करावा लागला आहे. त्याकरिता १०० मीटर लांबीचा पोहोचमार्ग व संरक्षण भिंत बांधण्याकरिता पालिकेकडून देण्यात येणारा १ कोटी १ लाख ७४ हजारांच्या निधीपैकी २० लाखांची गरज भासू लागली होती. पालिकेने पीडब्ल्यूडी प्रशासनाची ही गरज साांभाळून घेतली. मात्र त्यानंतर निधीची रक्कम देण्यास विलंब झाल्याने पुलाचे काम थंडावल्याचे निदर्शनास आलेहोते.