शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

यंदा तरी मोखाडावासीयांच्या समस्या सुटतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:04 IST

शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे

मोखाडा : शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहेस्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी , वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसोदूरच आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षानुवर्ष स्थलांतरित होत आहे दिवाळीचा सणाचा आनंद मावळताच येथील आदिवासी रोजगाराच्या शोधात आपल्या अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून शहराकडे रवाना झाला आहेयेथील कुपोषण तर पाठ सोडायला तयार नाही दरवर्षीच कुपोषण बळीच्या अनेक घटना घडत असल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन अपयशी ठरले आहे कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगार असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कसलीच यंत्रणा येथे उपलब्ध नाही केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाहीशहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लफंडाव असून त्यातच सततचे भारिनयमन व वाढीव बिल आकारणी यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे तालुक्याच्या ठिकाणी असलेले एकमेव ग्रामीण रु ग्णालय व आरोग्य केंद्रात सोईसुविधा मिळत नसल्याने खाजगी रु ग्णालयातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे.रुग्णांना उपचारासाठी नाशिक मुबंई ठाणे धाव घ्यावी लागते मोखाद्यात पाच मोठी मोठी धरणे असून देखील दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शिक्षण ज्ञानाचा तिसरा डोळा असे सांगितली जात असले तरी येथे रयतचे महाविद्यालाय आण िखोडाळ्याचे मोहिते कॉलेज सोडले तर इतर शिक्षणाची कोणतीच सोय नाही यामुळे येथील आदिवासी मुलांना नाशिक वसई पुणे मुबंई ठाणे येथे शिकायला जावे लागते.सार्वजनिक बांधकाम रस्ते विकासाच्या नावाखाली करोडोचा दरवर्षी खर्च करते तरी देखि खोडाळा मोखाडा जव्हार त्रिंबकेश्वर या मुख्य रस्त्याची दुरावस्थेत फारसा बद्दल झालेला नाही- मोखाडा तालुक्याचे ठिकाण असूनही येथे मनोरंजनाचे साधन नाही चित्रपटगृह नाही येथील परिसर डोंगर दर्या खाºयांनी नटलेला आहे. देवबांधचे गणपतीचे मंदिर अशोका धबधबा वाशाळा येथील बुद्ध लेणी पेंडक्याची वाडी येथील कमाणीचा धबधबा व प्राचीन वास्तू अशा विविधतेने हा परिसर नटलेला असून देखील प्रशासनाने पर्यटनासाठी प्रयत्न केलेले नाहीत यामुळे येथील आदिवासी आजही दारिद्याच्या काळोखातच चाचपडत असल्याने यामुळे या नवीन वर्षात तरी सोईसुविधा पुरवण्याचा शहाणपण येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना सुचेल का हा प्रश्न आहे.विकास कुठे गेला?तालुक्यातील बिवलपाडा रुईपाडा फनसपाडा कुर्लोद सावर्डे कुडवा अशा विविध गावपाड्यांना अजून पर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही. यामुळे डिजटल इंडिया, बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, म्हणजे काय रे भाऊ असाच सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार