शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

यंदा तरी मोखाडावासीयांच्या समस्या सुटतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:04 IST

शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे

मोखाडा : शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहेस्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी , वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसोदूरच आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षानुवर्ष स्थलांतरित होत आहे दिवाळीचा सणाचा आनंद मावळताच येथील आदिवासी रोजगाराच्या शोधात आपल्या अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून शहराकडे रवाना झाला आहेयेथील कुपोषण तर पाठ सोडायला तयार नाही दरवर्षीच कुपोषण बळीच्या अनेक घटना घडत असल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन अपयशी ठरले आहे कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगार असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कसलीच यंत्रणा येथे उपलब्ध नाही केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाहीशहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लफंडाव असून त्यातच सततचे भारिनयमन व वाढीव बिल आकारणी यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे तालुक्याच्या ठिकाणी असलेले एकमेव ग्रामीण रु ग्णालय व आरोग्य केंद्रात सोईसुविधा मिळत नसल्याने खाजगी रु ग्णालयातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे.रुग्णांना उपचारासाठी नाशिक मुबंई ठाणे धाव घ्यावी लागते मोखाद्यात पाच मोठी मोठी धरणे असून देखील दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शिक्षण ज्ञानाचा तिसरा डोळा असे सांगितली जात असले तरी येथे रयतचे महाविद्यालाय आण िखोडाळ्याचे मोहिते कॉलेज सोडले तर इतर शिक्षणाची कोणतीच सोय नाही यामुळे येथील आदिवासी मुलांना नाशिक वसई पुणे मुबंई ठाणे येथे शिकायला जावे लागते.सार्वजनिक बांधकाम रस्ते विकासाच्या नावाखाली करोडोचा दरवर्षी खर्च करते तरी देखि खोडाळा मोखाडा जव्हार त्रिंबकेश्वर या मुख्य रस्त्याची दुरावस्थेत फारसा बद्दल झालेला नाही- मोखाडा तालुक्याचे ठिकाण असूनही येथे मनोरंजनाचे साधन नाही चित्रपटगृह नाही येथील परिसर डोंगर दर्या खाºयांनी नटलेला आहे. देवबांधचे गणपतीचे मंदिर अशोका धबधबा वाशाळा येथील बुद्ध लेणी पेंडक्याची वाडी येथील कमाणीचा धबधबा व प्राचीन वास्तू अशा विविधतेने हा परिसर नटलेला असून देखील प्रशासनाने पर्यटनासाठी प्रयत्न केलेले नाहीत यामुळे येथील आदिवासी आजही दारिद्याच्या काळोखातच चाचपडत असल्याने यामुळे या नवीन वर्षात तरी सोईसुविधा पुरवण्याचा शहाणपण येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना सुचेल का हा प्रश्न आहे.विकास कुठे गेला?तालुक्यातील बिवलपाडा रुईपाडा फनसपाडा कुर्लोद सावर्डे कुडवा अशा विविध गावपाड्यांना अजून पर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही. यामुळे डिजटल इंडिया, बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, म्हणजे काय रे भाऊ असाच सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार