शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:45 IST

सातपाटी किनारपट्टी परिसरात चिंता : महत्प्रयासाने पकडून आणलेले मासे अवकाळीमुळे कुजले, विवंचनेत पडली भर

हितेन नाईक

पालघर : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन पातळीवरून शेतकऱ्यांना दिली जात असताना मच्छीमारांच्या कुजलेल्या माश्यांची नुकसान भरपाईचा दर मात्र अजून ठरलेला नाही. कर्जाचे डोंगर डोक्यावर घेत पुन्हा मासेमारीला जाऊन किनाºयावर आणलेले मासे वाळत घालण्याच्या वेळेसच पुन्हा सातपाटीसह किनारपट्टीवर पावसाच्या सरी कोसळल्याने महत्प्रयासाने पकडून आणलेल्या माश्यांचे आता करायचे तरी काय? अशा विवंचनेत मच्छीमार महिला आहेत.

आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १ लाख ५ हजार १६५.७४ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याने शासनाने त्यांना नुकसान भरपाईचे वाटप केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांचे दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. याच दरम्यान मच्छीमारांचे चक्रीवादळामुळे मासेमारीचे वाया गेलेले दिवस आणि अवकाळीमुळे कुजून गेलेल्या माशांच्या नुकसानीच्या भरपाईबाबत मात्र ना राज्य सरकार काही कार्यवाही करीत ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करत. त्यामुळे मच्छीमार समाज व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. मच्छिमार संघटनांनी, मच्छिमार नेत्यांनी आपल्या शिष्टमंडळासह नेहमीप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची निवेदने मंत्र्यांना दिली आहेत. मात्र २ महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. मच्छीमार सहकारी संस्थांकडून नुकसानीची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून मागविण्यात आल्याचे कळते. त्यानंतरही नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून कुठलीही घोषणा केली जात नाही. शासनाने २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नैसर्गिक आपत्तीदरम्यान देण्यात येणाºया नुकसान भरपाईच्या आदेशात अवकाळी अथवा नैसर्गिक आपत्ती-दरम्यान झालेल्या माश्यांची नुकसान भरपाई देण्याबाबत कुठलेही आदेशच नमूद केलेले नसल्याने मच्छीमारांना भरपाई देण्यात जिल्हाधिकाºयांसह सर्व यंत्रणा हतबल ठरली आहे.ढगाळ वातावरणामुळे मासे सुकवण्यात अडचणीच्समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सातपाटीसह अनेक गावातील बोटी किनाºयाला लागल्या आहेत. आपल्या बोटीतून किनाºयावर उतरलेल्या बोंबील, मांदेली, करंदी हे मासे निवडून ते मासे बांबूच्या वलांदीवर सुकविण्याच्या बेतात असताना अचानक पावसाने सुरुवात केल्याने आता या माश्यांचे करायचे काय? असा गंभीर प्रश्न त्यांच्या चेहºयावर दिसून येत होता.अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बोंबील व इतर मासे सुकत नसून मार्गशिर्ष महिना सुरू असल्याने ओले मासेही संपत नसल्याने महिला वर्ग चिंतेत आहे. दुहेरी संकटात सापडलेल्या या महिलांपुढे कुटुंबाचे आर्थिक चक्र चालवायचे कसे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून किनाºयावर पडलेल्या माश्यांकडे डोळ्यात पाणी आणून पाहण्याशिवाय आमच्यापुढे अन्य कुठला पर्याय शिल्लक नाही, असे हताश उद्गार योगिता मेहेर या महिलेने काढले.मत्स्य उत्पादनाचा आकडा डळमळतोय : दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनाचा आकडा डळमळू लागला असून सहकारी संस्था कर्जाच्या विळख्यात सापडू लागल्या आहेत. डिझेल अनुदानाचा थकलेला कोट्यवधी रुपयांचा आकडा, समुद्रातील वाढते प्रदूषण, वाढलेली महागाई आदी कारणांनी मच्छीमारी बोटी हळूहळू बंद पडू लागल्या आहेत, अशी चिंता सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर