शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सत्तेसाठी बविआसोबत करणार हातमिळवणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:27 IST

सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान : युतीतील वादाचे पडसाद उमटणार

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : देशात असलेली मोदी लाट आणि युतीच्या ताकदीवर पालघर जिल्हा परिषदेवर सत्ता प्रस्थापित करणाऱ्या भाजपची आता ही सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी मोठीच कसोटी लागणार आहे. ओसरलेल्या मोदी लाटेबरोबरच युतीमधील त्यांचा भागीदार असलेल्या शिवसेना पक्षानेही त्यांची साथ सोडल्याने सत्ता स्थापनेची त्यांची वाट बिकट बनली आहे. अशा वेळी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने बविआशी हातमिळवणी केल्याची माहिती पुढे येत आहे.पालघर जिल्हा परिषदेत भाजप २१, शिवसेना १५, बविआ १०, राष्ट्रवादी ४, माकप ५, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे एकूण ५७ जागांचे बलाबल असून सेनेसह बहुजन विकास आघाडीने दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपने आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. जिल्हा निर्मितीनंतर जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ आणि इतर पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप पक्ष कोणाशी तडजोड करून सत्ता स्थापन करेल ह्या बाबत संदिग्धता होती.राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर करीत सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर बविआनेही सत्ता स्थापनेसाठी भाजपला मदतीची आवश्यकता असल्याने बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर करीत आपला राजकीय शत्रू असलेल्या शिवसेनेची गोची करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी आपण बविआशी कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचे सेनेने जाहीर केले होते. आणि भाजपने बविआशी हातमिळवणी केल्यास सेना अशा युतीमध्ये सहभागी होणार नसल्याचे सेनेने स्पष्ट केले होते. सेनेच्या ह्या भूमिकेमुळे भाजपची मात्र कोंडी झाली होती. युतीतील आपल्या सहकारी पक्षाला नाकारून बविआशी आघाडी करून सत्ता स्थापन केल्यास मतदारांमध्ये वेगळा संदेश जाईल, अशी भीती भाजपला वाटत असल्याने शेवटी भाजपने सेनेशी युती करीत सत्ता स्थापन केली. अध्यक्षा म्हणून भाजपच्या सुरेखा थेतले तर उपाध्यक्षपदी सेनेच्या सचिन पाटील यांची निवड करण्यात आली होती. सध्या राज्यातील राजकीय चित्र बदलले असून भाजप-शिवसेनेची अभेद्य युती दुभंगली असून सेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी तयार करून सत्ता स्थापन केली आहे.‘रात्रीस खेळ’ : छुप्या डावाला सुरुवातच्भाजपनेही जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी आपल्या छुप्या डावाला सुरुवात केली असून सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि बहुजन विकास आघाडी एकत्र लढण्याच्या हालचालींसंदर्भात ‘रात्रीस खेळ’ सुरू झाले आहेत.च्युतीतील आपल्या नैसर्गिक मित्राला बाजूला करत शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळविल्याने राज्यात युतीतील दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाली असून त्याचे पडसाद आतापासूनत पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू लागले आहेत.