शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:57 IST

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली

राहुल वाडेकरविक्रमगड : पांढऱ्या कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात याच कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे. कांद्याच्या लागवडीला लागलेल्या रोगाने आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या रोगाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे.

म्हसरोली गावात सुमारे १०० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जात आहे. सफेद कांद्याला एकरी ३० ते ४० हजार खर्च येत असून यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. येथील पांढरा कांदा उत्तम दर्जाचा असल्याने त्याला मोठी मागणी असते. मागील वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा कहर वाढल्याने शेतकरी भुईसपाट झाला. मिळेल त्या भावाला कांदा विकून शेतकरी हवालदिल झाला. मात्र, या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर पुन्हा नव्याने उभारी घेत शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात कांदा लागवड केली. सातत्याने वातावरणात होणारे बदल यामुळे उद्भवणारी बुरशीजन्य रोगराई कांदा उद्ध्वस्त करीत आहे. यासोबतच येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली मिरचीदेखील करपून जात असून,  आजारावर योग्य औषधोपचार होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले. भाजीपाल्याचा विमा काढावा, जेणेकरून सुरक्षा कवच मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र विमा काढण्यात अडचणी येतात, असे येथील शेतकरी अशोक घरत यांनी  सांगितले.

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली, मात्र बुरशीमुळे कांदा खराब होत असल्याने आम्हाला मोठे नुकसान सोसवे लागणार आहे.  - रमेश परशुराम घरत, शेतकरी, म्हसरोली

काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात  जाऊन पाहणी करून मार्गदर्शन केले. शेतकरी व कृषी सेवा केंद्रदेखील अनेकदा चुकीची औषधे देतात. त्यामुळे उलट परिणाम दिसून येण्याची शक्यता असते.- आर.यू. इभाड, विक्रमगड तालुका कृषी अधिकारी.