शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:57 IST

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली

राहुल वाडेकरविक्रमगड : पांढऱ्या कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात याच कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे. कांद्याच्या लागवडीला लागलेल्या रोगाने आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या रोगाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे.

म्हसरोली गावात सुमारे १०० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जात आहे. सफेद कांद्याला एकरी ३० ते ४० हजार खर्च येत असून यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. येथील पांढरा कांदा उत्तम दर्जाचा असल्याने त्याला मोठी मागणी असते. मागील वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा कहर वाढल्याने शेतकरी भुईसपाट झाला. मिळेल त्या भावाला कांदा विकून शेतकरी हवालदिल झाला. मात्र, या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर पुन्हा नव्याने उभारी घेत शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात कांदा लागवड केली. सातत्याने वातावरणात होणारे बदल यामुळे उद्भवणारी बुरशीजन्य रोगराई कांदा उद्ध्वस्त करीत आहे. यासोबतच येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली मिरचीदेखील करपून जात असून,  आजारावर योग्य औषधोपचार होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले. भाजीपाल्याचा विमा काढावा, जेणेकरून सुरक्षा कवच मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र विमा काढण्यात अडचणी येतात, असे येथील शेतकरी अशोक घरत यांनी  सांगितले.

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली, मात्र बुरशीमुळे कांदा खराब होत असल्याने आम्हाला मोठे नुकसान सोसवे लागणार आहे.  - रमेश परशुराम घरत, शेतकरी, म्हसरोली

काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात  जाऊन पाहणी करून मार्गदर्शन केले. शेतकरी व कृषी सेवा केंद्रदेखील अनेकदा चुकीची औषधे देतात. त्यामुळे उलट परिणाम दिसून येण्याची शक्यता असते.- आर.यू. इभाड, विक्रमगड तालुका कृषी अधिकारी.