शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

प्रांत कार्यालय गेले कुठे?

By admin | Updated: October 10, 2015 23:30 IST

कित्येक महिन्यांपासून जव्हार येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत कार्यालयातील प्रांत अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तसेच कार्यालयाला नावाचा फलकसुद्धा नाही.

जव्हार : कित्येक महिन्यांपासून जव्हार येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत कार्यालयातील प्रांत अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तसेच कार्यालयाला नावाचा फलकसुद्धा नाही. त्यामुळे येथील आदिवासी जनतेची मोठी तारांबळ उडते आहे. प्रांत कार्यालय गेले कुठे, असा प्रश्न सर्वसाधारण आदिवासी बांधवांना पडतो आहे. जातीचे दाखले तसेच इतर दाखल्यांकरिता नेहमीप्रमाणे खेटे मारावे लागणाऱ्या कार्यालयाच्या कामकाजाला जनता कंटाळली होती. त्यात भरीसभर म्हणजे कार्यालयात प्रांत अधिकाऱ्यांचे पदच रिक्त असल्यामुळे आदिवासी जनतेचे हाल होत आहेत.सध्या जव्हारच्या प्रांत अधिकाऱ्यांचा पदभार वाडा येथील प्रांत अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र, ते कधीही जव्हारला येत नाहीत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर जून महिन्यात दाखल्यांसाठी गर्दी होत होती. त्या वेळी वाडा प्रांतही रजेवर गेल्यामुळे जव्हारचा पदभार डहाणू उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, याची माहिती जनतेला नसल्याने ते दाखल्यांवरील सहीसाठी वाडा आणि मग तिथून डहाणू असे खेटे मारत होते. त्या वेळी प्रसिद्ध माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला होता, त्या वेळी लवकरच जव्हारचे प्रांत अधिकारी रिक्त पद भरले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजतागायत हे रिक्त पद भरण्यात आलेले नाही. भरीसभर म्हणजे कार्यालयाचा फलकच कित्येक महिन्यांपासून गायब आहे. त्यामुळे कार्यालय बंदच आहे का, असा प्रश्न पडला आहे. (वार्ताहर)- सध्या रेतीच्या गाड्यांची पकडापकडी जास्त प्रमाणात सुरू झाली आहे. म्हणजेच इतक्या वर्षात कारवाई शून्य आणि आता अचानक गाड्यांची पकडापकडी तहसील व प्रांत कार्यालयाकडून केली जात आहे. एका ब्रासची रॉयल्टी असताना २ ब्रास माल आणणे व एका ब्रासला दंड ठोठावणे अशा कारवाया सध्या प्रांत कार्यालयाकडून होत आहेत. मग, याच कारवाया या आधी का झाल्या नाही? अचानक कारवाई करण्याचे कारण काय? पूर्वी रॉयल्टी नव्हती तरी गौणखनिजाच्या गाड्या सर्रासपणे वावरत होत्या. त्या वेळी कार्यालय झोपी गेले होते का? असे अनेक प्रश्न येथील जनता करीत आहे.