शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

वाळूउपसा रोखणार कधी?

By admin | Updated: January 2, 2017 03:35 IST

तालुक्यातील पिंजाळ या बारमाही वाहणाऱ्या नदीतून पीक व मलवाडा गावांच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा अगदी राजरोसपणे सुरु असून ती रोखण्यासाठी अनेकदा हाती

वाडा : तालुक्यातील पिंजाळ या बारमाही वाहणाऱ्या नदीतून पीक व मलवाडा गावांच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा अगदी राजरोसपणे सुरु असून ती रोखण्यासाठी अनेकदा हाती घेतलेली मोहीम निष्पळ ठरली आहे. काही दिवसांपूर्वी पीक ग्रामपंचायतीने रेतीउपसा बंदीचा ठराव देखील मंजूर केला होता. मात्र आता पुन्हा रेतीउपसा सुरु झाला असून मलवाडा गावाच्या हद्दीतून वाळू वाहतूक केली जात आहे. मात्र विक्रमगड महसूल विभाग डोळ््यावर पट्टी बांधून असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.पिंजाळ नदीवर पीक व मलवाडा गावाच्या हद्दीतून बेसुमार वाळूउपासा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असल्याने निसर्गाने नटलेल्या या नदीचे अस्तित्व संपुष्टात येते आहे. यानंतर वनविभागाने कार्यवाही केल्याने धाबे दणाणलेल्या वाळू तस्करांनी आपला मोर्चा मलवाडा हद्दीकडे वळवला असून तेथून आताही बेसुमार वाळूउपसा सुरु आहे. रात्री मलवाडा मार्गे या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महसूल विभाग मात्र आपल्या हद्दीच्या अडचणी दाखवून कारवाई टाळत आहेत. हद्द कुठलीही असली तरी याचा फटका मात्र जवळपास ५ हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याला बसणार असल्याने तालुक्याच्या हद्दीचा विचार न करता प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.पिंजाळ नदीवर दिवसा होणारा वाळूउपसा महसूल विभागाच्या लक्षात आणून सुद्धा कुठलीही कारवाई का झाली नाही. यात अधिकाऱ्यांचे हात ओले होतात का? असा सवाल नागरिकांनी केला असून या प्रकरणी लक्ष घालून पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पिंजाळ नदी वाळू तस्करांच्या तावडीतून पूर्णत: मुक्त करावी आता या प्रशासनाविरोधात उपोषण केले जाईल असे प्रविण पांडुरंग पाटील यांनी सांगितले.या वाळू ठियांचा लिलाव झाला आहे काय असल्यास कधी? आणि किती रकमेला झाला आहे. किती ब्रास वाळू काढण्याची परवानगी आहे, व किती काढली जाते आहे. याची वाहतूक परवान्यानुसार होते का? याची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (वार्ताहर)