शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

उपनिबंधक कार्यालयात रिक्त पदांची भरती कधी?; वसईतील स्थिती, कामाचा वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:52 IST

राज्यात सर्वाधिक गृहनिर्माण संस्था असलेला वसई हा एकमेव तालुका आहे. वसई तालुका उपनिबंधक कार्यालयात एकूण आठ पदे शासनाच्या वतीने मंजूर असली तरी वर्ग ३ ची दोन पदे आजपर्यंत रिक्त आहेत.

आशिष राणे वसई : तालुक्यातील ग्रामीण व शहरातील सहकारी संस्थांचा कारभार उत्तमरीत्या वसई उपनिबंधक कार्यालय जरी सांभाळत असले तरी हा कारभार अजूनही शासनाच्या सन १९८१ च्या शासन आकृतिबंधानुसारच सुरू आहे, मात्र त्या सर्वाधिक कामकाजाचा त्रास उपलब्ध उपनिबंधक व सहकारी यांना होत आहे.

राज्यात सर्वाधिक गृहनिर्माण संस्था असलेला वसई हा एकमेव तालुका आहे. वसई तालुका उपनिबंधक कार्यालयात एकूण आठ पदे शासनाच्या वतीने मंजूर असली तरी वर्ग ३ ची दोन पदे आजपर्यंत रिक्त आहेत. एकूण वर्ग ३ नुसार ६ पदे मंजूर आहेत, परंतु त्यापैकी शासनाने ४ पदेच भरलेली आहेत. शिपायांचे म्हणजे वर्ग ४ चे एक  पद भरलेले आहे, शिवाय वर्ग १ म्हणजेच उपनिबंधक स्वत:, पैकी मंजूर पदे वर्ग ३ पैकी ४ भरलेली आहेत व २ अजूनही रिक्त आहेत, मात्र वर्ग ४ पैकी १ मंजूर पद भरलेले आहे.

विशेष म्हणजे आज तालुक्यातील लोकसंख्या ३० लाखांच्या वर आहे व वसई, नालासोपारा, विरार व ग्रामीण भागातील शेतकरी संख्या, संस्था व गृहनिर्माण संस्था यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ७ हजारच्या आसपास आहे. त्यातच महापालिका शहर भाग व ग्रामीण भागातील संस्था पाहिल्या  तर तक्रारीचे प्रमाण जास्त आहे. त्यातून मधल्या काळात वर्ग ३ चा एक अधिकारी पालघर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बदली केल्याने अजूनही वसईत कामांची आबाळ झाली.

वसई ग्रामीण व शहरासह तालुक्यात ८० हून अधिक सहकारी व नोकरदार पतसंस्था आहेत. या सर्वांचा कारभार सांभाळला जाण्यासोबतच पीककर्ज वाटप, पीक कर्जावरील व्याजमाफीचे महत्त्वाचे कामदेखील याच कार्यालयामार्फत केले जाते. विशेषत: गृहनिर्माण संस्था व अवैध सावकारीला आळा घालण्याची जबाबदारी या कार्यालयावर आहे. परंतु ही सर्व कामे करण्यासाठी आवश्यक कर्मचारी संख्या आजही उपलब्ध नाही. सहकार खात्याचा मंजूर आकृतिबंध १९८१ ला आला, मात्र त्या वेळी इथे सहायक उपनिबंधक पद होते. मात्र जशी लोकसंख्या वाढली, संस्था वाढल्या, त्यानुसार शासनाचा आकृतिबंध व कर्मचारी, अधिकारी संख्या वाढली नाही. त्यामुळे आजवर  याबाबतीत प्रत्येक तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयातील उपनिबंधकसहित कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

आज वसईत ७ हजारच्या वर अधिक संस्था कार्यरत आहेत. पैकी ६ हजार ५०० हून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. तीन सहकारी बँका आहेत. त्यामुळे नक्कीच तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.सद्य:स्थितीत या कार्यालयात एकूण ८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ पदांवर कर्मचारीवर्ग आहे. केवळ दोन पदे, तीही वर्ग ३ ची अद्यापही रिक्त आहेत. तक्रारी आहेत, पण निरसन व कामे कधी करणार? असा सवाल विचारला जात आहे.

अपुऱ्या मनुष्यबळाचा कामकाजावर परिणाम

  1. सध्या वर्ग १ नुसार उपनिबंधक हे पद त्यात मंजूर वर्ग ३ नुसार ६ पदे मंजूर आहेत. पैकी २ पदे अजूनही रिक्त आहेत, तर वर्ग ४ चे पद मंजूर व भरलेलं आहे. 
  2. अर्थातच वर्ग १ व वर्ग ३ मधील ४ मंजूर व भरलेल्या पदांमुळेही तालुक्यातील कारभारात सुसूत्रता येत नाही. आजही जेमतेम तीन वा चार अधिकारी - कर्मचारी वर्गावर या वसई उपनिबंधक कार्यालयाचा कारभार सुरू आहे. 
  3. परिणामी, गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारीचे प्रमाण जास्त आहे, तर सोबत सावकारीच्या तक्रारी व  इतरही अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.