शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

विक्रमगड तालुक्यात विहिरींनी गाठला तळ; पाणीटंचाईने सहारेपाड्यातील लोक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:47 IST

पाड्यात एक विहीर असून ती पूर्णपणे आटली आहे. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे

विक्रमगड : वसुरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सहारेपाड्यात पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे. ५० घरांची वस्ती व सुमारे ३०० लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाणीटंचाईची स्थिती असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

पाड्यात एक विहीर असून ती पूर्णपणे आटली आहे. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. एक बोअरवेल असून या बोअरवेलला दूषित पाणी येत असल्याने येथील महिलांना पहाटे उठून पाणी भरावे लागत आहे. त्यात वसुरी सहारेपाडासाठी ग्रामपंचायत अंतर्गत २०१७-१८ साली एकूण ४ लाख रुपये खर्च करण्यात येऊन योजना तयार करण्यात आली. केवळ दोन महिने ही योजना चालली. त्यानंतर ही योजना आजतागायत बंदच असल्याचे येथील महिला मनीषा सदाशिव महाले, संजना विनोद अवतार, जयश्री दिलीप महाले, सुमन मधुकर गवळी, शीतल हरिश्चंद्र महाले यांनी सांगितले.