शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे स्रोत वाचवणे गरजेचे!

By admin | Updated: May 11, 2017 01:39 IST

वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे .

सुनील घरत। लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे . नागरी भागातील नागरिकांना प्राप्त होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. वसईच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आपापल्या भागात रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करणे, उपलब्ध बावखळे व विहिरी वाचवणे ,पाण्याचे जमिनीतील संधारण वाढविणे , त्यासाठी ठिकठिकाणी व डोंगर उतारावर चर खणणे, उपलब्ध स्त्रोतातील गाळ साफ करणे अशा उपाय योजना करणे महत्वाच्या आहे . वसई उप प्रदेश हा मुंबई महानगरीलगत असल्याने येथे नागरीकिरणाचा वेग मोठा आहे. त्याच्या मानाने पायाभूत सुविधांबरोबर पाण्याची सोय ही अत्यंत महत्वाची आहे. शहरी भागासाठी महापालिकेची जलपुरवठा यंत्रणा आहे परंतु ग्रामीण भाग मात्र उपेक्षितच राहिला आहे.याबाबतीत येथील ग्रामपंचायतींना व नियोजनबद्ध काम करावे लागेल . याच बरोबर येथील नागरिकांचेही पाण्याचा योग्य वापर कसा करावा, पाणी कमीत कमी कसे वापरावे, पाण्याची बचत कशी करावी याबाबत प्रबोधन करावे लागेल.याची सर्व जबाबदारी शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माथी मारण्याऐवजी जागरूक नागरिकांनीही आपल्या परिसरात आवश्यकती दक्षता घेऊन जनप्रबोधन केले पाहिजे. अन्यथा दरसाल प्रमाणे एप्रिल, मे व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष सहन करावे लागेल. गेल्या वर्षी वरूण राजा आपल्यावर प्रसन्न होऊन योग्य बरसला आहे . त्यामुळे वसई उप प्रदेशातील सागरी व डोंगरी भागात पावसाळा संपल्यानंतर अजूनही काही ठिकाणचे ओहोळ वाहणे सुरु आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्था,वनविभाग व जागरूक नागरिकांनी वनराई बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी साठवले आहे. मात्र ते प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे. ते वाढवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. सांडपाण्याचा वापर वेगवेगळ्या संकुलातील उद्यांनांसाठी अथवा स्वच्छतेसाठी करणे, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर न करणे, बांधकामांसाठी पाण्याची कनेक्शन्स न देणे, असतील ती बंद करणे असे इलाज केले तर पाणीटंचाई तीव्रता निश्चितच कमी करता येईल. उपहारगृहे व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी टाळली तरी त्यातून मोठी पाणीबचत होऊ शकते त्या दृष्टीनेही जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.