शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे स्रोत वाचवणे गरजेचे!

By admin | Updated: May 11, 2017 01:39 IST

वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे .

सुनील घरत। लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे . नागरी भागातील नागरिकांना प्राप्त होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. वसईच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आपापल्या भागात रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करणे, उपलब्ध बावखळे व विहिरी वाचवणे ,पाण्याचे जमिनीतील संधारण वाढविणे , त्यासाठी ठिकठिकाणी व डोंगर उतारावर चर खणणे, उपलब्ध स्त्रोतातील गाळ साफ करणे अशा उपाय योजना करणे महत्वाच्या आहे . वसई उप प्रदेश हा मुंबई महानगरीलगत असल्याने येथे नागरीकिरणाचा वेग मोठा आहे. त्याच्या मानाने पायाभूत सुविधांबरोबर पाण्याची सोय ही अत्यंत महत्वाची आहे. शहरी भागासाठी महापालिकेची जलपुरवठा यंत्रणा आहे परंतु ग्रामीण भाग मात्र उपेक्षितच राहिला आहे.याबाबतीत येथील ग्रामपंचायतींना व नियोजनबद्ध काम करावे लागेल . याच बरोबर येथील नागरिकांचेही पाण्याचा योग्य वापर कसा करावा, पाणी कमीत कमी कसे वापरावे, पाण्याची बचत कशी करावी याबाबत प्रबोधन करावे लागेल.याची सर्व जबाबदारी शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माथी मारण्याऐवजी जागरूक नागरिकांनीही आपल्या परिसरात आवश्यकती दक्षता घेऊन जनप्रबोधन केले पाहिजे. अन्यथा दरसाल प्रमाणे एप्रिल, मे व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष सहन करावे लागेल. गेल्या वर्षी वरूण राजा आपल्यावर प्रसन्न होऊन योग्य बरसला आहे . त्यामुळे वसई उप प्रदेशातील सागरी व डोंगरी भागात पावसाळा संपल्यानंतर अजूनही काही ठिकाणचे ओहोळ वाहणे सुरु आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्था,वनविभाग व जागरूक नागरिकांनी वनराई बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी साठवले आहे. मात्र ते प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे. ते वाढवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. सांडपाण्याचा वापर वेगवेगळ्या संकुलातील उद्यांनांसाठी अथवा स्वच्छतेसाठी करणे, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर न करणे, बांधकामांसाठी पाण्याची कनेक्शन्स न देणे, असतील ती बंद करणे असे इलाज केले तर पाणीटंचाई तीव्रता निश्चितच कमी करता येईल. उपहारगृहे व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी टाळली तरी त्यातून मोठी पाणीबचत होऊ शकते त्या दृष्टीनेही जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.