शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

जव्हार तालुक्यातील पेरण्या वाया

By admin | Updated: June 20, 2017 06:42 IST

पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत दडी मारल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच यंत्रांच्या नांगरीणीच्या युगात नंदनमाळ

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत दडी मारल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच यंत्रांच्या नांगरीणीच्या युगात नंदनमाळ येथील शेतकरी मात्र गरीबीमुळे लाकडी नांगराचा वापर करीत आहेत.जून च्या पाहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे भात, नागली, तुरी, वरी, उडीद, भुईमूग, हळद, याची लागवड केली, त्यानंतर त्याला लागणारे महागडे खतही विकत घेऊन शेतात टाकले आहे. परंतु पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत पाऊस पडेल याचीही काही शाश्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा जिल्हा बँक अडचणीत असल्याने व अन्य कुठून आर्थिक सहाय्य मिळालेले नसतांनाही शेतकऱ्यांनी अनेक लटपटी खटपटी करून नांगरणी, पेरणी केली, त्यासाठी महागडे मजूरही वापरले, मात्र गेल्या १८ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे ते सारे फुकट गेल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेकडो शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पं.स. कृषी विभागात नुकसान भरपाई करीता अर्ज करून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे. नंदनमाळ येथील १५ ते २० शेतकरी एकत्र येऊन दुसऱ्या पाड्यातील सुताराकडून नविन लाकडी नांगरणी अवजारे तयार करून शेतीची तयारी करीत असतात मोठी मेहनत घेऊन १२ ते १५ कि.मी. अंतरावर ही अवजड अवजारे डोक्यावर वाहून नेतात येथील गरीब आदिवासी जनतेला शेती शिवाय दुसार पर्याय नसल्यामुळे हंगामाच्या काळात भूमीहिन मजुरांना मोठी मागणी असते, मात्र शेतीचा हंगाम संपल्यानंतर त्यांच्या हाताला कामे नसल्यामुळे त्यांच्यापुढे स्थलांतर शिवाय पर्याय नसतो. ते विटभट्टी, बांधकाम व अन्य क्षेत्रात रोजगार शोधत असतात.