शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सीओंसाठी विक्रमगडला उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:09 IST

जानेवारीपासून सुरु झालेलेल्या विक्रमगडच्या नगरपंचायतीला गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकारी न लाभल्याने तो तातडीने नेमला जावा यासाठी नगराध्य

- लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जानेवारीपासून सुरु झालेलेल्या विक्रमगडच्या नगरपंचायतीला गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकारी न लाभल्याने तो तातडीने नेमला जावा यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक मंगळवारपासून उपोषणाला बसणार आहेत. आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री विष्णू सवरा यांचा हा मतदारसंघ असल्याने तिथल्याच नगरपंचायतीचा गेले ५ महिने बोजवारा उडाला तरी ते धृतराष्ट्र का झाले आहेत, असा प्रश्न सगळ्या जिल्ह्याला पडला आहे.सवरा हे अत्यंत स्वार्थी राजकारणी आहेत. वाडा पंचायततील भाजपची सत्ता टिकावी आणि मतदारांनी शिवसेनेचे शांताराम मोरे यांना विजयी केल्याची शिक्षा मतदारांना मिळावी यासाठी त्यांनी वाडा ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊ दिली नाही.तर विक्रमगड येथील नगरपंचायतीत निलेश सांबरे प्रणीत आघाडीची सत्ता आल्याने व भाजपाचा दारूण पराभव झाल्याने त्यांनी या पंचायतीला मुख्याधिकारीच लाभू दिलेला नाही. त्यात ससेहोलपट नागरिकांची होते आहे. विकास कामे सोडा दैनंदिन कारभारही करता येणे शक्य झालेले नाही. विष्णू सवरा यांचा हा मतदार संघ असल्याने त्यांचेकडे लेखी निवेदने सादर केली आहेत़ मात्र त्याची काडीमात्र दखल घेतली जात नसल्याने तसेच विक्रमगड बाजरपेठेमध्ये गटारिंच्या व रस्त्यांच्या दुतर्फा दुकाना समोर भाजीवाले,फळविक्रेते,व अन्य दुकानदारांनी आपली दुकाने थाटुन अतिक्रमण केलेले आहे़ टप-या टाकलेल्या आहेत त्यामुळे अतिक्रमण हटविणे बाबत आणि मोठी पाणी पुरवठा योजना मंजुर करणे या मागण्या घेवुन आज तहसिलदार कार्यालयासमोर उपोषणास बसून न्या मागणार आहेत़ ़विक्रमगडच्या मुख्य बाजारपेठेमधील गटारीवर गटारीच्या बाहेर टप-या टाकून व्यवसाय करणारे,भाजी, फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने मोठयाप्रमाणावर ट्रॅफीक जॅम होते,त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तर गेल्या अनेक वर्षापासून नव्या फिल्टर योजनेचा प्रस्ताव धूळखात पडलेला आहे़ त्यामुळे आजही येथील ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने े आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या विरोधात नगरपंचायत एकवटली आहे.अशी आहे अवस्थानवनिर्मित विक्रमगड नगरपंचायतीचा कार्यभार जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आहे़ मात्र ते ही येथे एखादी दुसरी फेरी मारुन कारभार करीत असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होते आहे.मंत्री सवरा नॉट रिचेबलसवरा यांच्याशी संपूर्ण दिवसभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला नाही. ते राष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.ही तर मतदारांना शिक्षाया नगरपंचायतीत शहरवासीयांनी विरोधकांना सत्ता प्रदान केली. त्याची शिक्षा पालकमंत्री आपलाच मतदारसंघ असलेल्या शहरातील जनतेला जाणूनबुजून देत आहेत काय- निलेश सांबरेचार महिने दुर्लक्षआम्ही मुख्याधिकारी नेमण्यासाठी मंत्री सवरा यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत़ मात्र त्याकडे दुर्लक्ष केले-रविंद्र खुताडे, नगरध्यक्ष, विक्रमगड