शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

वसईत होणार ८ एकराचे मार्केट यार्ड

By admin | Updated: December 23, 2015 00:28 IST

रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार ५५५ कोटींची तरतूद करताना शेतकरी व मच्छीमारांच्या उत्पादनाना रास्त भाव मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी वसई येथे आठ एकर जागेमध्ये मार्केट

पालघर : रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार ५५५ कोटींची तरतूद करताना शेतकरी व मच्छीमारांच्या उत्पादनाना रास्त भाव मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी वसई येथे आठ एकर जागेमध्ये मार्केट यार्ड उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. चिंतामण वनगा यांनी पालघर येथे एका कार्यक्रमात दिली.पालघर येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक माहिती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. विलास तरे, जि. प. अध्यक्ष सुरेखा थोतले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, सय्यद अख्तर, तहसिलदार चंद्रसेन पवार, डॉ. केळकर इ. मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना खा. वनगा म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वावलंबी भारताचे स्वप्न पाहिले व त्यादृष्टीने ते प्रयत्नही करीत आहेत. परदेशी दौरे करून देशात पुरेशी गुंतवणूक आणण्याद्वारे विकास करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. तर लोकापर्यंत विविध योजना पोहचविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून पालघरमध्ये या आधीच विस्तारीत समाधन योजनेचे काम सुरू असून लाभार्थ्याचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपविभागीय अधिकारी दावभट यांनी सांगितले.आजपासून तीन दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून प्रधानमंत्री, जनधन योजना, महिला सबळीकरण, अल्प संख्यांकासाठी १५ कलमी कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मत्स्यविभाग योजना, इ. विविध विभागाच्या योजनांचे स्टॉलर्स व योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले तर बचतगटाने तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉलही उभारण्यात आले होते. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला. (वार्ताहर)