शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

वसईत कांदा १०० रुपये किलो

By admin | Updated: August 22, 2015 22:25 IST

आज वसई-विरारच्या बाजारात कांद्याच्या दराने उच्चांक गाठला. दोन दिवसांपूर्वी ६० रुपये किलो या दराने मिळणाऱ्या कांद्याची आज १०० रु पये किलो दराने विक्री होत होती.

वसई : आज वसई-विरारच्या बाजारात कांद्याच्या दराने उच्चांक गाठला. दोन दिवसांपूर्वी ६० रुपये किलो या दराने मिळणाऱ्या कांद्याची आज १०० रु पये किलो दराने विक्री होत होती. या दरवाढीचा परिणाम विक्रीवरही जाणवल्याचे अनेक कांदा विक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे औषधी म्हणून ओळख असलेला वसईचा सुप्रसिद्ध पांढरा कांदाही बाजारातून गायब झाला आहे. कांद्याच्या उसळीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला तो परवडेनासा झाला आहे.मान्सूनपूर्व पडलेला अवकाळी पाऊस तसेच मोसमी पावसाने दिलेल्या ओढीमुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या शेतीवर झाला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. यामुळे आवक व विक्री यामधील तफावतीमुळे कांद्याने भाव खाल्ला आहे.सणासुदीच्या काळात वसई-विरारच्या बाजारात भाजीपाल्याचेही दर आकाशाला भिडले आहेत. श्रावणात साधारण भाजीपाला स्वस्त असतो. मात्र, यंदा हे गृहीतकही मोडीत निघाले आहे. कांदा विक्रेत्यांनी आज सकाळपासून १०० रुपये किलो या दराने तो विकण्यास सुरुवात केल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले नसेल तरच नवल. वसई-विरार परिसरात वाशी, नाशिक व वसईच्या ग्रामीण भागामधून कांदा विक्रीसाठी येत असतो. वसईच्या भुईगाव व कळंब या भागात पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते.परंतु, काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे औषधी म्हणून ओळख असलेला हा पांढरा कांदा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे यंदा पांढरा कांदा बाजारात पाहावयास मिळाला नाही. कांद्याचे दर वाढल्यामुळे विक्रीवरही त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. पूर्वी ग्राहक दीड ते दोन किलो एका वेळी कांदा खरेदी करत असत, ते प्रमाण आता पाव किलो व अर्धा किलोवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबरच विक्रेतेही हैराण झाले आहेत.