शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

वाढता उकाडा अन् वाहतूककोंडीच्या जाचाने वसई-विरारकरांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:23 IST

वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

वसई : वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.महापालिका आणि वसई वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव लक्षात घेता वेळीच या कोंडीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. वसई, अंबाडी रोड, माणिकपूर नाका तसेच पापडी, आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारा वसई पूर्व विभाग म्हणजेच गोखिवरे रेंज आॅफिस आणि सातिवली दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. दरम्यान वसई (पूर्व) हा तालुक्यातील एक मोठा औद्योगिक पट्टा असून साधारण वीस हजारांहुन अधिक महिला - पुरूष असा कामगार वर्ग रोज येथून प्रवास करतो. मात्र, सर्वांचा प्रवासाचा वेळ हा वाहतूक कोंडीतच जातो. तसेच डावीकडे गुजरात आणि उजवीकडे मुंबईला जोडणाऱ्या महामार्गवार जाण्यासाठी गोखिवरे व सातिवली अशा दोन स्थानिक महामार्गाचा वापर करावा लागतो. येथील गोखिवरे रेंज आॅफिस आणि तिथे सातिवली अशा दुहेरी ठिकाणी वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.कोंडीचा सर्वाधिक त्रास दुचाकींनाशहरातील वाहतूक कोंडीमुळे चालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. त्यात सर्वाधिक त्रास दुचाकी धारकांना होत असून गाडीचे क्लच, गियर आणि ब्रेक यावर नियंत्रण ठेवता -ठेवता हाताची तसेच पायाला फारच त्रास होतो. गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान प्रवास करायला तब्बल एक तासाचा कालावधी लागत आहे.अंबाडी रोड आणि माणिकपूरनाक्यावर वाहतूक पोलीस गायबवसई अंबाडी रोड आणि माणिकपूर या दोन मुख्य नाक्यावर चार रस्ते एकत्रित येतात. या ठिकाणी दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. तर सायं. ६ ते ९ दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मात्र, नेमकी कोंडीच्या वेळीच वाहतूक पोलीस देखील बºयाच वेळा गायब राहतात.रुग्णवाहिकादेखील कोंडीत?गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ६ ते ९ दरम्यान वसई वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कधी कर्तव्यावर असतात तर कधी नसतात. पोलीस नसल्यास चालक आपल्या मनाप्रमाणे वाहन चालवतात. वाहतूक पोलिसांचे नियोजन तसेच निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे चालकांकडून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही. आणि रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यास त्याचे प्राणसुद्धा जाऊ शकतात.अंबाडी जुना रेल्वे उड्डाणपूल बंदचवसई (पूर्व) ते वसई (पश्चिम) असा जोडणारा रेल्वे उड्डाण पूल तीन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद आहे. यामुळे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या संदर्भात वसई विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे बाबीवर प्रकाश पडला.वसई-पूर्व अंबाडी रोड ते गोखिवरे रेंज आॅफिस दरम्यान होणारी वाहतूक कोंडी बाबत वसई विरार महापालिकेनं मधल्या काळात रस्ता रु ंदीकरण कार्यक्र म हाती घेतला असून ग्रामस्थांशी चर्चा करून वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत होईल याबाबत ठोस पाऊले उचलली आहेत. अजून १५ ते २० दिवसानंतर ही वाहतूक कोंडी बºयापैकी मुक्त होईल, तसेच अंबाडी रोड येथील परिवहनच्या बसेस पार्कींगमधून काढून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे, त्यातच निवडणुका लागल्याने वाहतूक पोलीस व इतर ठिकाणचा बंदोबस्त पाहता थोडी कमी आहे पण आम्ही काळजी घेऊ !- संपतराव पाटीलवरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार