शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

वाढता उकाडा अन् वाहतूककोंडीच्या जाचाने वसई-विरारकरांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:23 IST

वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

वसई : वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.महापालिका आणि वसई वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव लक्षात घेता वेळीच या कोंडीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. वसई, अंबाडी रोड, माणिकपूर नाका तसेच पापडी, आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारा वसई पूर्व विभाग म्हणजेच गोखिवरे रेंज आॅफिस आणि सातिवली दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. दरम्यान वसई (पूर्व) हा तालुक्यातील एक मोठा औद्योगिक पट्टा असून साधारण वीस हजारांहुन अधिक महिला - पुरूष असा कामगार वर्ग रोज येथून प्रवास करतो. मात्र, सर्वांचा प्रवासाचा वेळ हा वाहतूक कोंडीतच जातो. तसेच डावीकडे गुजरात आणि उजवीकडे मुंबईला जोडणाऱ्या महामार्गवार जाण्यासाठी गोखिवरे व सातिवली अशा दोन स्थानिक महामार्गाचा वापर करावा लागतो. येथील गोखिवरे रेंज आॅफिस आणि तिथे सातिवली अशा दुहेरी ठिकाणी वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.कोंडीचा सर्वाधिक त्रास दुचाकींनाशहरातील वाहतूक कोंडीमुळे चालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. त्यात सर्वाधिक त्रास दुचाकी धारकांना होत असून गाडीचे क्लच, गियर आणि ब्रेक यावर नियंत्रण ठेवता -ठेवता हाताची तसेच पायाला फारच त्रास होतो. गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान प्रवास करायला तब्बल एक तासाचा कालावधी लागत आहे.अंबाडी रोड आणि माणिकपूरनाक्यावर वाहतूक पोलीस गायबवसई अंबाडी रोड आणि माणिकपूर या दोन मुख्य नाक्यावर चार रस्ते एकत्रित येतात. या ठिकाणी दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. तर सायं. ६ ते ९ दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मात्र, नेमकी कोंडीच्या वेळीच वाहतूक पोलीस देखील बºयाच वेळा गायब राहतात.रुग्णवाहिकादेखील कोंडीत?गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ६ ते ९ दरम्यान वसई वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कधी कर्तव्यावर असतात तर कधी नसतात. पोलीस नसल्यास चालक आपल्या मनाप्रमाणे वाहन चालवतात. वाहतूक पोलिसांचे नियोजन तसेच निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे चालकांकडून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही. आणि रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यास त्याचे प्राणसुद्धा जाऊ शकतात.अंबाडी जुना रेल्वे उड्डाणपूल बंदचवसई (पूर्व) ते वसई (पश्चिम) असा जोडणारा रेल्वे उड्डाण पूल तीन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद आहे. यामुळे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या संदर्भात वसई विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे बाबीवर प्रकाश पडला.वसई-पूर्व अंबाडी रोड ते गोखिवरे रेंज आॅफिस दरम्यान होणारी वाहतूक कोंडी बाबत वसई विरार महापालिकेनं मधल्या काळात रस्ता रु ंदीकरण कार्यक्र म हाती घेतला असून ग्रामस्थांशी चर्चा करून वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत होईल याबाबत ठोस पाऊले उचलली आहेत. अजून १५ ते २० दिवसानंतर ही वाहतूक कोंडी बºयापैकी मुक्त होईल, तसेच अंबाडी रोड येथील परिवहनच्या बसेस पार्कींगमधून काढून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे, त्यातच निवडणुका लागल्याने वाहतूक पोलीस व इतर ठिकाणचा बंदोबस्त पाहता थोडी कमी आहे पण आम्ही काळजी घेऊ !- संपतराव पाटीलवरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार