शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

वसई-विरार उपप्रदेशात आरक्षित जमिनीची ऐशी-तैशी

By admin | Updated: August 12, 2015 23:11 IST

सार्वजनिक हितासाठी आरक्षित झालेल्या जमिनी संपादित न केल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात आहेत. पाणीपुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य व अन्य बाबींसाठी या जमिनी

वसई : सार्वजनिक हितासाठी आरक्षित झालेल्या जमिनी संपादित न केल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात आहेत. पाणीपुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य व अन्य बाबींसाठी या जमिनी आरक्षित करण्यात आल्या. परंतु, त्या ठरावीक मुदतीत संपादीत न केल्यामुळे सध्या या जमिनींवर समाजकं टक सरसकट अनधिकृत बांधकामे करीत आहेत. वसई-विरार शहराच्या पूर्वेस अशा आरक्षित जमिनी मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी गिळंकृत केल्या.केंद्र सरकारने यापूर्वी आरक्षित केलेल्या जमिनी संपादीत करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. परंतु, नव्या सरकारने ही मुदत १० वर्षांपासून १२ वर्षांपर्यंत वाढविली आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद पालघर जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. यापूर्वी सार्वजनिक हितासाठी अनेक जमिनी आरक्षित करण्यात आल्या. वसई-विरार उपप्रदेशात सिडको प्राधिकरण कार्यरत असताना तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात विविध उद्देशांसाठी जमिनीवर आरक्षणे टाकण्यात आली. परंतु, कालांतराने या आराखड्यातील आरक्षणे बदलली गेली तसेच काही आरक्षित जमिनी समाजकंटकांनी गिळंकृत करून त्यावर सरसकट अनधिकृत बांधकामे उभारली. वसई-विरार पूर्वेस विकास आराखड्यात असलेल्या रस्त्याच्या आरक्षित जागेवर आजमितीस शेकडो इमारती बांधण्यात आल्या आहेत. असाच प्रकार पालघर शहरातही पाहावयास मिळतो. जमिनी अशा प्रकारे गिळंकृत झाल्यामुळे वसई-विरार उपप्रदेशामध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पराकोटीला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जमीन संपादन करण्याची मुदत केंद्र सरकारने २ वर्षांनी वाढविल्यामुळे भविष्यात या जमिनी सार्वजनिक उद्दिष्टांसाठी शिल्लक राहणार नाहीत, अशी सर्वत्र चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)