शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिकेच्या कचरा ठेक्यात घोटाळा

By admin | Updated: June 16, 2017 01:11 IST

कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराने कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपैकी ८२ कर्मचाऱ्यांना तब्बल ५६ दिवस स्वत:च्या ठेक्यावर राबवून घेतले. त्याचवेळी सदर ठेकेदाराला निविदा रकमेत

- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई: कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराने कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपैकी ८२ कर्मचाऱ्यांना तब्बल ५६ दिवस स्वत:च्या ठेक्यावर राबवून घेतले. त्याचवेळी सदर ठेकेदाराला निविदा रकमेत तब्बल पावणेचार कोटी रुपयांची वाढ करून दिली. यात मोठा घोटाळा झाल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा आणि ८२ कर्मचाऱ्यांच्या नावाने उकळलेली रक्कम तिजोरीत जमा करावी, असा आदेश वसई-विरार महापालिका आयुक्तांना दिला आहे. साफसफाईच्या ठेक्यात महाघोटाळा झाल्याचे वसई भाजपाचे अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी उजेडात आणले आहे. विशेष म्हणजे महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर केलेल्या तक्रारींकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केल्यावर घुटुकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पालिकेने शिवम इंटरप्रायझेसला १ जानेवारी २०१४ पासून कचरा उचलण्याचा ठेका दिला होता. ठेकेदाराने काम सुरू केल्यानंतर अचानक २७ आॅक्टोबर २०१४ पासून तब्बल ८२ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या विविध दवाखाने व आरोग्य केंद्रांत काम करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर पालिकेच्या आस्थापनेवरील सदर ८२ कर्मचारी ५६ दिवस काम करीत होते. ठेकेदाराला सदर कर्मचाऱ्यांचा ठेका देण्यात आला. त्यासाठी रक्कम अदा केली. प्रत्यक्षात मात्र आस्थापनेवरील ८२ कर्मचारी वापरून त्यांना पालिकेच्या तिजोरीतून पगार दिला. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशीची मागणी घुटुकडे यांनी पुराव्यासह आयुक्तांकडे केली होती. त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेत आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कायमस्वरूपी कर्मचारी ५६ दिवस कुठे काम करीत होते. याची संबंधित अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी. संबंधितांकडून बेकायदेशीररीत्या अदा करण्यात आलेली सर्व रक्कम वसूल करावी. घुटुकडे यांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या आणि तक्रारीचे उत्तर न दिल्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.चौकशीची मागणीसलग दोन वर्षे एकाच रकमेत काम करणाऱ्या ठेकेदाराला २०१४-१५ या वर्षासाठी तब्बल ३ कोटी ८८ लाख १६ हजार ६२८ रुपयांची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे याही प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.