शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

वसई-विरार महापालिका निवडणूक : दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या आशेवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 09:57 IST

वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून, २०२० रोजीच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही.

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेचा बार एप्रिल महिन्यात उडण्याची शक्यता असतानाच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. निवडणूक लवकरच होईल, या आशेवर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांची साफ निराशा झाली आहे, तसेच मोर्चेबांधणीसाठी सज्ज असलेल्या राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही निरुत्साहाचे वातावरण आहे.वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून, २०२० रोजीच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही. पालिकेची मुदत संपून आता ९ महिने पूर्ण होतील. मात्र, अजूनही पालिका निवडणुकीला विलंबाचा सूर लागतच चालला आहे. मध्यंतरी कोरोनाचा आलेख घसरल्यानंतर, पालिका निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा राजकीय मोर्चेबांधणीला जोर वाढला होता. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होऊन त्यावरील हरकती व सुनावणीही आता सुरू आहे. मात्र, मध्येच कोरोना पुन्हा टपकल्याने निवडणुकीवर पुन्हा संक्रांत ओढावली आहे. निवडणुकीसाठी हळदी समारंभ, सामाजिक उपक्रमांना इच्छुक उमेदवारांनी चांगला जोर वाढविला होता. संभावित उमेदवार व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून त्यासाठी मोठा खर्चही  करण्यात आला होता. मात्र, या सर्व खर्चावर कोरोना प्रादुर्भावाने चादर ओढल्याने राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक आणखी काही महिने दूर ढकलली गेली आहे. काही महिन्यांच्या फरकाने राजकीय पक्षांना तयारीसाठी वेळ मिळाला असला, तरी तयारी केलेल्या इच्छुकांची घालमेल मात्र वाढली आहे. 

गावांचा निकाल काय लागणार? पुढील ९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात होत असलेल्या २९ गावांच्या सुनावणीकडे आता वसईकरांचे लक्ष असणार आहे. सलग दोनदा सुनावणी पुढे ढकलून उच्च न्यायालयाने वसईकरांची हुरहूर वाढविली आहे. आता पुढील तारखेला वसई-विरार शहर महानगरपालिकेचा निकाल काय लागतो, त्याकडे वसईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. जोपर्यंत गावांच्या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीवर टांगती तलवार असणार आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक