शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

वसई-विरार महानगरपालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा होतो गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:02 IST

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग  कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

- आशीष राणेलोकमत न्यूज नेटवर्क वसई : वसई-विरार महापालिका हद्दीमधील शहरांत दररोज ६५० टन कचरा जमा होत असतो. महापालिकेच्या एकूण ९ प्रभागांतून हा कचरा नियमितपणे गोळा केला जातो. शहरांत कचरा संकलनासाठी ६ प्रकारची एकूण ६७२ वाहने कार्यरत आहेत. यामध्ये ११४ डीपर, ५७ कॉम्पॅक्टर, ६४ डम्पर, २० ट्रॅक्टर, २०८ ट्रायसिकल, २०९ हातगाडी यांचा समावेश आहे.

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

ठेका आणि कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत वसई-विरार महानगरपालिका हद्दीमधील तीनही  शहरांत कचरा संकलन, त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आदीसाठी स्वच्छता विभागात ठेका व कायमस्वरूपी असे एकूण ३ हजार ४१२ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. महानगरपालिका हद्दीतील एकूण ९ प्रभागांत ५७ ठेका मुकादम तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. ते आपले काम चोखपणे बजावीत आहेत. 

या सर्व कचऱ्याचे विघटन आणि विल्हेवाट लावण्यासाठी सध्या तरी महानगरपालिका प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्थापन कंपनी वा प्रोजेक्ट कंपनी नाही. कचरा विल्हेवाट प्रोजेक्ट- बाबतीत महापालिकेच्या वतीने विविध राज्ये, देशांतर्गत किंवा देशाबाहेरील विघटन करणाऱ्या कंपन्या यांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत आम्ही अभ्यासही करीत आहोत. - गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी

वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणावसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे. त्यावरूनच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.महापालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा गोळा होतो. वसई पूर्व गोखिवरे येथील डम्पिंग ग्राउंडवर हा कचरा टाकला जातो. पालिका हद्दीत केवळ एकच डम्पिंग ग्राउंड आहे. 

कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी वसई-विरार महापालिका हद्दीतील तीनही शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो. मात्र शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्याची समस्या मोठी असल्याने डम्पिंग ग्राऊंड असलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दम्यासारख्या श्वसनाच्या विकारांनी हे नागरिक त्रस्त झालेले आहेत. यामुळे पालिकेेने कचऱ्याच्या समस्येवर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार