शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महानगरपालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा होतो गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:02 IST

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग  कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

- आशीष राणेलोकमत न्यूज नेटवर्क वसई : वसई-विरार महापालिका हद्दीमधील शहरांत दररोज ६५० टन कचरा जमा होत असतो. महापालिकेच्या एकूण ९ प्रभागांतून हा कचरा नियमितपणे गोळा केला जातो. शहरांत कचरा संकलनासाठी ६ प्रकारची एकूण ६७२ वाहने कार्यरत आहेत. यामध्ये ११४ डीपर, ५७ कॉम्पॅक्टर, ६४ डम्पर, २० ट्रॅक्टर, २०८ ट्रायसिकल, २०९ हातगाडी यांचा समावेश आहे.

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

ठेका आणि कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत वसई-विरार महानगरपालिका हद्दीमधील तीनही  शहरांत कचरा संकलन, त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आदीसाठी स्वच्छता विभागात ठेका व कायमस्वरूपी असे एकूण ३ हजार ४१२ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. महानगरपालिका हद्दीतील एकूण ९ प्रभागांत ५७ ठेका मुकादम तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. ते आपले काम चोखपणे बजावीत आहेत. 

या सर्व कचऱ्याचे विघटन आणि विल्हेवाट लावण्यासाठी सध्या तरी महानगरपालिका प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्थापन कंपनी वा प्रोजेक्ट कंपनी नाही. कचरा विल्हेवाट प्रोजेक्ट- बाबतीत महापालिकेच्या वतीने विविध राज्ये, देशांतर्गत किंवा देशाबाहेरील विघटन करणाऱ्या कंपन्या यांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत आम्ही अभ्यासही करीत आहोत. - गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी

वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणावसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे. त्यावरूनच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.महापालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा गोळा होतो. वसई पूर्व गोखिवरे येथील डम्पिंग ग्राउंडवर हा कचरा टाकला जातो. पालिका हद्दीत केवळ एकच डम्पिंग ग्राउंड आहे. 

कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी वसई-विरार महापालिका हद्दीतील तीनही शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो. मात्र शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्याची समस्या मोठी असल्याने डम्पिंग ग्राऊंड असलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दम्यासारख्या श्वसनाच्या विकारांनी हे नागरिक त्रस्त झालेले आहेत. यामुळे पालिकेेने कचऱ्याच्या समस्येवर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार