शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
4
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
5
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
6
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
7
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
8
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
9
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
10
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
11
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
12
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
13
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
14
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
15
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
16
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
17
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
18
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
19
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
20
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे

वसई-विरार महानगरपालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा होतो गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:02 IST

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग  कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

- आशीष राणेलोकमत न्यूज नेटवर्क वसई : वसई-विरार महापालिका हद्दीमधील शहरांत दररोज ६५० टन कचरा जमा होत असतो. महापालिकेच्या एकूण ९ प्रभागांतून हा कचरा नियमितपणे गोळा केला जातो. शहरांत कचरा संकलनासाठी ६ प्रकारची एकूण ६७२ वाहने कार्यरत आहेत. यामध्ये ११४ डीपर, ५७ कॉम्पॅक्टर, ६४ डम्पर, २० ट्रॅक्टर, २०८ ट्रायसिकल, २०९ हातगाडी यांचा समावेश आहे.

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

ठेका आणि कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत वसई-विरार महानगरपालिका हद्दीमधील तीनही  शहरांत कचरा संकलन, त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आदीसाठी स्वच्छता विभागात ठेका व कायमस्वरूपी असे एकूण ३ हजार ४१२ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. महानगरपालिका हद्दीतील एकूण ९ प्रभागांत ५७ ठेका मुकादम तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. ते आपले काम चोखपणे बजावीत आहेत. 

या सर्व कचऱ्याचे विघटन आणि विल्हेवाट लावण्यासाठी सध्या तरी महानगरपालिका प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्थापन कंपनी वा प्रोजेक्ट कंपनी नाही. कचरा विल्हेवाट प्रोजेक्ट- बाबतीत महापालिकेच्या वतीने विविध राज्ये, देशांतर्गत किंवा देशाबाहेरील विघटन करणाऱ्या कंपन्या यांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत आम्ही अभ्यासही करीत आहोत. - गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी

वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणावसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे. त्यावरूनच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.महापालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा गोळा होतो. वसई पूर्व गोखिवरे येथील डम्पिंग ग्राउंडवर हा कचरा टाकला जातो. पालिका हद्दीत केवळ एकच डम्पिंग ग्राउंड आहे. 

कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी वसई-विरार महापालिका हद्दीतील तीनही शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो. मात्र शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्याची समस्या मोठी असल्याने डम्पिंग ग्राऊंड असलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दम्यासारख्या श्वसनाच्या विकारांनी हे नागरिक त्रस्त झालेले आहेत. यामुळे पालिकेेने कचऱ्याच्या समस्येवर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार